शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

शेतक-यांना पाणीमिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आशुतोष काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 14:03 IST

गोदावरी कालव्याचे आवर्तन मिळावे यासाठी शेतक-यांनी पाटबंधारे विभागाकडे रीतसर सात नंबर अर्ज भरून दिले आहेत.

कोपरगाव  : गोदावरी कालव्याचे आवर्तन मिळावे यासाठी शेतक-यांनी पाटबंधारे विभागाकडे रीतसर सात नंबर अर्ज भरून दिले आहेत. त्याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांना समक्ष भेटून अडीच किलोमीटर पर्यंत पाणी देण्याची अट रद्द करावी, अन्यथा आपण राहाता उपविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असे निवेदन दिले होते. परंतु यासंदर्भात पाटबंधारे विभागाने शेतक-यांच्या बाबतीत कोणताच सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे आपण सांगीतल्याप्रमाणे ठिय्या आंदोलन करीत असून जोपर्यंत सात नंबर अर्ज केलेल्या सर्वच शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नसणार नाही असा इशारा कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी दिला.आशुतोष काळे यांच्या आवाहनाला पाठींबा देत रामपूरवाडीच्या शेतक-यांनी दोन दिवसापासून पाटबंधारे कार्यालयात आमरण उपोषण सुरु केले आहे. काळे ठिय्या आंदोलन करण्यासाठी आंदोलन स्थळी पोहोचण्यापूर्वीच उपविभागीय अभियंता कासम गोटमवार नाशिक येथे वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले. उपविभागीय अभियंता कासम गोटमवार यांना परिस्थितीची जाणीव करून दिली.तीन दिवसांपूर्वीच एका पाटबंधारे विभाग फक्त अडीच किलोमीटर पर्यंतच शेतीसासाठी पाणी देणार असल्याची माहिती शेतक-यांना दिली होती. घेतलेला हा निर्णय लाभक्षेत्रातील शेतक-यांवर अन्याय करणारा आहे. तसेच शेतक-यांच्या दु:खाची जाणीव नसणा-या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना तालुक्यात काय चालू आहे याची पुसटशी कल्पना नसते त्यांनी माझ्या मागणीला टीका समजूनखिल्ली उडविली. गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय दुदैर्वाची गोष्ट असल्याची खंतही यावेळी आशुतोष काळे यांनी व्यक्त केली .

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव