शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

शेतकरी संपाची ज्योत तेवत ठेवणार : पुणतांब्यातील आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:17 IST

पुणतांबे (ता. राहाता) येथील शेतकरी संपाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावात शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

शिवाजी पवारश्रीरामपूर : पुणतांबे (ता. राहाता) येथील शेतकरी संपाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावात शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. दुसरीकडे भारतीय किसान सभेने राज्यभर संपाचा वर्धापन दिन साजरा केला. या ऐतिहासिक घटनेची ज्योत कायमची तेवत ठेवून वेळप्रसंगी पुन्हा सरकारला घेरण्याची धग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे.पुणतांबे येथे शनिवारी संपाचे प्रमुख धनंजय धोर्डे, सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, संभाजी गमे, गणेश बनकर, रामकृष्ण डोखे, विजय धनवटे, सुधाकर जाधव यांनी गावातील शेतकरी पुतळ्याला हार घातला. दुसरीकडे संपाचा प्रमुख भाग राहिलेल्या कॉ. अजित नवले यांनीही अकोले येथे दुसरा वर्धापन साजरा केला.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतकऱ्यांनी पुकारलेला हा पहिलाच संप होता. कामगार वर्गाप्रमाणे शेतकरीही संप करू शकतो ही भावना प्रत्यक्षात अवतरली गेली. पुणतांबे येथे १ जून २०१७ रोजी अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेला रोष यातून दिसला. शेतकºयांनी स्वत:पुरते उत्पादन घ्यावे व बाजार समित्यांमध्ये मालाची विक्री करायची नाही, असे या आंदोलनाचे सूत्र होते.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, दुधाला ५० रुपये लिटर दर निश्चित करावा, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीजबिल माफ करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. दूध तसेच भाजीपाल्याची विक्री करायची नाही असा निर्धार यात करण्यात आला होता.दोन वर्षानंतर या संपाचे फलित काय तसेच शेतकरी आंदोलनाला त्याने नेमकी काय दिशा दिली याबाबत ऊहापोह सध्या सुरू आहे. यानिमित्ताने संपातील काहीप्रमुख नेत्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. कॉ. अजित नवले म्हणाले, पुणतांबे येथील शेतकरी संप तसेच दिल्लीचा किसान मार्च यामुळे जगण्यामरण्याचे नेहमीचे प्रश्न प्रथमच चव्हाट्यावर आले. शेतकरी हा मुद्दा केंद्रस्थानी आला.राज्य सरकारने जी सुमारे २० हजार कोटी रुपयांची जी काही कर्जमाफी दिली ते याच संपाचे यश आहे. केंद्रातील मोदी सरकारने दिलेली कृषी सन्मान योजना, शेतमालाच्या हमी भावात केलेली वाढ ही मोठी उपलब्ध झाली. शेतकºयांचे प्रश्न राजकीय पक्षांच्या व निवडणुकीच्या अजेंड्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपाची आठवण जनतेत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे कॉ. नवले म्हणाले.आंदोलनाने सरकारला धडा शिकविलासंपाचे प्रमुख धनंजय धोर्डे यांनी राज्य सरकारशी त्यावेळी केलेली बोलणी चुकल्याचे मान्य केले. सरकारने आम्हाला भुलविले, चकवा दिला. मात्र आंदोलनाने सरकारला धडा शिकविला. मराठा, धनगर आरक्षण, विद्यार्थी मोर्चा यांत सर्वात परिणामकारक आंदोलन शेतकरी संपाच्या माध्यमातून झाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता