शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

शेतकरी संपाची ज्योत तेवत ठेवणार : पुणतांब्यातील आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:17 IST

पुणतांबे (ता. राहाता) येथील शेतकरी संपाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावात शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

शिवाजी पवारश्रीरामपूर : पुणतांबे (ता. राहाता) येथील शेतकरी संपाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावात शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. दुसरीकडे भारतीय किसान सभेने राज्यभर संपाचा वर्धापन दिन साजरा केला. या ऐतिहासिक घटनेची ज्योत कायमची तेवत ठेवून वेळप्रसंगी पुन्हा सरकारला घेरण्याची धग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे.पुणतांबे येथे शनिवारी संपाचे प्रमुख धनंजय धोर्डे, सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, संभाजी गमे, गणेश बनकर, रामकृष्ण डोखे, विजय धनवटे, सुधाकर जाधव यांनी गावातील शेतकरी पुतळ्याला हार घातला. दुसरीकडे संपाचा प्रमुख भाग राहिलेल्या कॉ. अजित नवले यांनीही अकोले येथे दुसरा वर्धापन साजरा केला.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतकऱ्यांनी पुकारलेला हा पहिलाच संप होता. कामगार वर्गाप्रमाणे शेतकरीही संप करू शकतो ही भावना प्रत्यक्षात अवतरली गेली. पुणतांबे येथे १ जून २०१७ रोजी अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेला रोष यातून दिसला. शेतकºयांनी स्वत:पुरते उत्पादन घ्यावे व बाजार समित्यांमध्ये मालाची विक्री करायची नाही, असे या आंदोलनाचे सूत्र होते.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, दुधाला ५० रुपये लिटर दर निश्चित करावा, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीजबिल माफ करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. दूध तसेच भाजीपाल्याची विक्री करायची नाही असा निर्धार यात करण्यात आला होता.दोन वर्षानंतर या संपाचे फलित काय तसेच शेतकरी आंदोलनाला त्याने नेमकी काय दिशा दिली याबाबत ऊहापोह सध्या सुरू आहे. यानिमित्ताने संपातील काहीप्रमुख नेत्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. कॉ. अजित नवले म्हणाले, पुणतांबे येथील शेतकरी संप तसेच दिल्लीचा किसान मार्च यामुळे जगण्यामरण्याचे नेहमीचे प्रश्न प्रथमच चव्हाट्यावर आले. शेतकरी हा मुद्दा केंद्रस्थानी आला.राज्य सरकारने जी सुमारे २० हजार कोटी रुपयांची जी काही कर्जमाफी दिली ते याच संपाचे यश आहे. केंद्रातील मोदी सरकारने दिलेली कृषी सन्मान योजना, शेतमालाच्या हमी भावात केलेली वाढ ही मोठी उपलब्ध झाली. शेतकºयांचे प्रश्न राजकीय पक्षांच्या व निवडणुकीच्या अजेंड्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपाची आठवण जनतेत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे कॉ. नवले म्हणाले.आंदोलनाने सरकारला धडा शिकविलासंपाचे प्रमुख धनंजय धोर्डे यांनी राज्य सरकारशी त्यावेळी केलेली बोलणी चुकल्याचे मान्य केले. सरकारने आम्हाला भुलविले, चकवा दिला. मात्र आंदोलनाने सरकारला धडा शिकविला. मराठा, धनगर आरक्षण, विद्यार्थी मोर्चा यांत सर्वात परिणामकारक आंदोलन शेतकरी संपाच्या माध्यमातून झाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता