शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शेतकरी संपाची ज्योत तेवत ठेवणार : पुणतांब्यातील आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:17 IST

पुणतांबे (ता. राहाता) येथील शेतकरी संपाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावात शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

शिवाजी पवारश्रीरामपूर : पुणतांबे (ता. राहाता) येथील शेतकरी संपाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावात शेतकरी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. दुसरीकडे भारतीय किसान सभेने राज्यभर संपाचा वर्धापन दिन साजरा केला. या ऐतिहासिक घटनेची ज्योत कायमची तेवत ठेवून वेळप्रसंगी पुन्हा सरकारला घेरण्याची धग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे.पुणतांबे येथे शनिवारी संपाचे प्रमुख धनंजय धोर्डे, सरपंच डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, संभाजी गमे, गणेश बनकर, रामकृष्ण डोखे, विजय धनवटे, सुधाकर जाधव यांनी गावातील शेतकरी पुतळ्याला हार घातला. दुसरीकडे संपाचा प्रमुख भाग राहिलेल्या कॉ. अजित नवले यांनीही अकोले येथे दुसरा वर्धापन साजरा केला.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतकऱ्यांनी पुकारलेला हा पहिलाच संप होता. कामगार वर्गाप्रमाणे शेतकरीही संप करू शकतो ही भावना प्रत्यक्षात अवतरली गेली. पुणतांबे येथे १ जून २०१७ रोजी अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेला रोष यातून दिसला. शेतकºयांनी स्वत:पुरते उत्पादन घ्यावे व बाजार समित्यांमध्ये मालाची विक्री करायची नाही, असे या आंदोलनाचे सूत्र होते.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, दुधाला ५० रुपये लिटर दर निश्चित करावा, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीजबिल माफ करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. दूध तसेच भाजीपाल्याची विक्री करायची नाही असा निर्धार यात करण्यात आला होता.दोन वर्षानंतर या संपाचे फलित काय तसेच शेतकरी आंदोलनाला त्याने नेमकी काय दिशा दिली याबाबत ऊहापोह सध्या सुरू आहे. यानिमित्ताने संपातील काहीप्रमुख नेत्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. कॉ. अजित नवले म्हणाले, पुणतांबे येथील शेतकरी संप तसेच दिल्लीचा किसान मार्च यामुळे जगण्यामरण्याचे नेहमीचे प्रश्न प्रथमच चव्हाट्यावर आले. शेतकरी हा मुद्दा केंद्रस्थानी आला.राज्य सरकारने जी सुमारे २० हजार कोटी रुपयांची जी काही कर्जमाफी दिली ते याच संपाचे यश आहे. केंद्रातील मोदी सरकारने दिलेली कृषी सन्मान योजना, शेतमालाच्या हमी भावात केलेली वाढ ही मोठी उपलब्ध झाली. शेतकºयांचे प्रश्न राजकीय पक्षांच्या व निवडणुकीच्या अजेंड्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपाची आठवण जनतेत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे कॉ. नवले म्हणाले.आंदोलनाने सरकारला धडा शिकविलासंपाचे प्रमुख धनंजय धोर्डे यांनी राज्य सरकारशी त्यावेळी केलेली बोलणी चुकल्याचे मान्य केले. सरकारने आम्हाला भुलविले, चकवा दिला. मात्र आंदोलनाने सरकारला धडा शिकविला. मराठा, धनगर आरक्षण, विद्यार्थी मोर्चा यांत सर्वात परिणामकारक आंदोलन शेतकरी संपाच्या माध्यमातून झाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता