शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

वेळेत ऊसतोड होत नसल्याने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:15 IST

दहीगावने : कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही अनेक शेतकऱ्यांच्या उसाला तोड आली नाही. ...

दहीगावने : कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही अनेक शेतकऱ्यांच्या उसाला तोड आली नाही. त्यामुळे शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या चांगलेच धास्तावले आहेत. ऊस तुटून जाण्यास उशीर झाला तर एकरी उत्पादनात खूप मोठी घट होईल.

शिवाय रब्बी हंगामातील पिकांनाही विलंब होत आहे. त्यामुळे ऊसतोड मिळावी, यासाठी शेतकरी कारखाना व्यवस्थापनाकडे चकरा मारत आहेत.

शहर टाकळी व परिसर मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकक्षेत येतो. शिवाय वृद्धेश्वर, गंगामाई, प्रवरा, केदारेश्वर, मुळा आदी कारखान्यांनाही येथील शेतकरी काही प्रमाणात ऊस देत असतात. मागील वर्षीच्या चांगल्या पर्जन्यमानामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे पुढील दोन वर्ष शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊस पिकाला अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे ऊस क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे यावर्षी या परिसरात ऊसतोडणीसाठी मजुरांची संख्या वाढवणे अपेक्षित होते; मात्र तसे न झाल्याने ऊस तुटण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ऊसतोड टोळ्यांची संख्या वाढवून तातडीने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

---

काही शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी तर काहींनी बियाण्यासाठी ऊस विकून खोडवा उसात अंतरपीक तर काहींनी नवीन पिके घेतली; मात्र कारखान्याशी केलेला करार आणि सभासदत्वाशी बांधील अनेकांनी मातृसंस्था असलेल्या कारखान्यात ऊस पाठवायचा, या उद्देशाने ऊस ठेवलेला आहे; मात्र ऊस जायला उशीर होत असल्याने आता हेही शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

-वैभव गवारे,

माजी सरपंच, शहर टाकळी.

----

ऊस नोंदी घेतानाच गडबड

ऊस लागवडीनंतर कारखान्याकडे लागवड नोंदी दिल्या जातात. तेव्हा तारखा मागेपुढे झाल्या की त्याचा परिणाम ऊस तोडणीच्या वेळी दिसून येतो. आपल्यानंतर लागवड झालेल्या उसाला अगोदर तोड आली की कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वादावादी होते. त्यामुळे ऊस लागवडीनंतर नोंदी घेण्याचे काम पारदर्शी व्हायला हवे, असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.