शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत ऊसतोड होत नसल्याने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:15 IST

दहीगावने : कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही अनेक शेतकऱ्यांच्या उसाला तोड आली नाही. ...

दहीगावने : कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरीही अनेक शेतकऱ्यांच्या उसाला तोड आली नाही. त्यामुळे शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या चांगलेच धास्तावले आहेत. ऊस तुटून जाण्यास उशीर झाला तर एकरी उत्पादनात खूप मोठी घट होईल.

शिवाय रब्बी हंगामातील पिकांनाही विलंब होत आहे. त्यामुळे ऊसतोड मिळावी, यासाठी शेतकरी कारखाना व्यवस्थापनाकडे चकरा मारत आहेत.

शहर टाकळी व परिसर मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकक्षेत येतो. शिवाय वृद्धेश्वर, गंगामाई, प्रवरा, केदारेश्वर, मुळा आदी कारखान्यांनाही येथील शेतकरी काही प्रमाणात ऊस देत असतात. मागील वर्षीच्या चांगल्या पर्जन्यमानामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे पुढील दोन वर्ष शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊस पिकाला अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे ऊस क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे यावर्षी या परिसरात ऊसतोडणीसाठी मजुरांची संख्या वाढवणे अपेक्षित होते; मात्र तसे न झाल्याने ऊस तुटण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ऊसतोड टोळ्यांची संख्या वाढवून तातडीने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

---

काही शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी तर काहींनी बियाण्यासाठी ऊस विकून खोडवा उसात अंतरपीक तर काहींनी नवीन पिके घेतली; मात्र कारखान्याशी केलेला करार आणि सभासदत्वाशी बांधील अनेकांनी मातृसंस्था असलेल्या कारखान्यात ऊस पाठवायचा, या उद्देशाने ऊस ठेवलेला आहे; मात्र ऊस जायला उशीर होत असल्याने आता हेही शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

-वैभव गवारे,

माजी सरपंच, शहर टाकळी.

----

ऊस नोंदी घेतानाच गडबड

ऊस लागवडीनंतर कारखान्याकडे लागवड नोंदी दिल्या जातात. तेव्हा तारखा मागेपुढे झाल्या की त्याचा परिणाम ऊस तोडणीच्या वेळी दिसून येतो. आपल्यानंतर लागवड झालेल्या उसाला अगोदर तोड आली की कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वादावादी होते. त्यामुळे ऊस लागवडीनंतर नोंदी घेण्याचे काम पारदर्शी व्हायला हवे, असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.