शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

पाण्यासाठी शेतकरी गाळात : भीमा नदीकाठावरील शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 19:36 IST

कर्जत, श्रीगोंदा तालुक्याच्या दक्षिण भागास वरदान ठरलेले उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरूनही नियोजनाअभावी रिकामे झाल्याने शेतकऱ्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नदीतील गाळ बाजूला करून विद्युतपंप सुरू ठेवावे लागत आहेत.

सिद्धटेक : कर्जत, श्रीगोंदा तालुक्याच्या दक्षिण भागास वरदान ठरलेले उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरूनही नियोजनाअभावी रिकामे झाल्याने शेतकऱ्यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नदीतील गाळ बाजूला करून विद्युतपंप सुरू ठेवावे लागत आहेत.भीमा नदीवरील उजनी जलाशय यावर्षी १०९ टक्के भरूनही जलसंपदा विभागाच्या नियोजनाअभावी पाणी साठा हा जलाशय आता रिकामा झाला आहे. पाणी संपत आल्याने पिकांना शेवटचे पाणी देण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. त्यासाठी त्यांना नदीतील गाळ बाजूला करून पाईप टाकून विद्युतपंप पुढे घ्यावे लागत आहेत. पाण्याबरोबर गाळ, शंख शिंपले आल्याने ते विद्युत पंपाच्या फुटवॉलला बसत असल्याने ते काढण्यासाठी शेतकऱ्यांना या गाळमिश्रीत पाण्यात बसूनच राहिले तरच, विद्युत पंप सुरळीत चालतात.

हाता तोंडला आलेले पीक एका पाण्यासाठी हातचे जायची वेळ आली आहे. उजनी जलाशयाच्या इतिहासात पूर्ण भरूनहीे ते पूर्णपणे रिकामे होण्याची ही पहिली वेळ आहे. पाणी कमी होत असल्याने विद्युतपंप सुरू ठेवणे गरजेचे आहे. यामुळे लोकसभा निवडणूकरूपी लोकशाहीच्या मोठ्या सणात आम्हा शेतकºयांना आनंदाने सहभागी होता येत नाही, याची खंत आहे. -विठ्ठल जगताप, शेतकरी भांबोरा.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर