शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

मुळा आवर्तनासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: August 29, 2014 01:33 IST

राहुरी : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. वरिष्ठांशी चर्चा करून येत्या आठ-दहा दिवसांत पाणी

राहुरी : मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. वरिष्ठांशी चर्चा करून येत्या आठ-दहा दिवसांत पाणी सोडण्याबाबत मुळा पाटबंधारे विभागातर्फे लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मुळा धरणात पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाचे कारण देऊन पाटबंधारे विभागाने सोडलेले पाणी बंद केले. परंतु लाभक्षेत्रात म्हणावा असा पाऊस झालेला नाही. कोल्हापूर पध्दतीचे बंधारे कोरडेठाक असल्याने शेतीचे, तसेच पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत. त्यामुळे त्वरित पाणी सोडावे या मागणीसाठी बाळासाहेब पेरणे व उत्तमराव म्हसे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून दहा दिवसात पाठपुरावा केला जाईल, असे लेखी आश्वासन मुळा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप नवलाखे यांनी दिले़ मुळा नदीपात्रात असलेले चार कोल्हापूर पध्दतीचे बंधारे वर्षातून तिनदा भरून देण्यात यावे, अशी मागणी उत्तमराव म्हसे यांनी केली़ यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल, असे नवलाखे यांनी स्पष्ट केले़राजेंद्र शेटे, गंगाधर पेरणे, प्रमोद हारदे, जनार्दन पेरणे, गोरक्षनाथ खडके, रामचंद्र पेरणे, गोरक्षनाथ तारडे, कानिफनाथ धसाळ, बाळासाहेब धसाळ, शंकर पेरणे, आण्णासाहेब धसाळ, दत्तात्रय घोलप, जयवंता गुडधे, किरण जाधव, संभाजी जाधव, विलास सैंदोरे, प्रदीप नाईक, अण्णासाहेब आंधळे, सतीष जाधव आदी यावेळी उपस्थित होते़ माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मोबाईलवरून आंदोलकांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली़(तालुका प्रतिनिधी)