शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:29 IST

कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापा-यांनी भाव पाडल्याचा आरोप करीत शनिवारी संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने एकच गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकोपरगाव बाजार समितीभाव पाडल्याचा व्यापा-यांवर आरोप

कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापा-यांनी भाव पाडल्याचा आरोप करीत शनिवारी संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने एकच गोंधळ उडाला.शनिवारी सकाळी अकरा वाजता तालुक्यातील शेतकºयांनी बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला. मात्र १ हजार ७०० रुपयांचा भाव काढल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर ज्ञानदेव रोहोम, संजय लोखंडे, जनार्दन रोहोम, विकास भिंगारे, अशोक लोखंडे, हरिभाऊ शिंदे आदी संतप्त शेतकºयांनी २ हजार ५०० चा भाव देण्याची मागणी करीत कांद्याचे लिलाव बंद पाडले. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. दरम्यान उपसभापती नानासाहेब गव्हाणे यांनी तातडीने शेतकरी व व्यापाºयांची बैठक घेऊन समजूत काढली. परंतु शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे एक वाजेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू होऊ शकले नाहीत. सभापती मधुकर टेके व सचिव परसराम सिनगर उपस्थित होते.कारवाई केली जाईल. लिलावात चुकीचे वागणा-यांवर कारवाई केली जाईल. व्यापा-यांनी सुध्दा शेतक-यांना अधिक मोबदला देण्याची काळजी घ्यावी. शेतक-यांनी व्यापा-यांना विनाकारण त्रास देऊ नये. लिलावास गैरहजर ३-४ व्यापा-यांना नोटिसा काढण्यात येतील. चुकीचे वागणाया शेतक-यांना समज देण्यात येईल.-नानासाहेब गव्हाणे, उपसभापती.

शाब्दिक चकमक

कांद्याला येवला-राहात्याप्रमाणे भाव देण्याची शेतकºयांची मागणी होती. त्यावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. काही शेतकरी जाणीवपूर्वक लिलाव बंद पाडतात, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे. आजचे भाव सरासरी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रूपये निघाले होते. लिलावास १५ पैकी १० व्यापारी हजर होते.-परसराम सिनगर, सचिव.कठोर कारवाई करावीज्याचा माल नाही, त्याने व्यापा-याला शिवीगाळ केली. वास्तवत: ज्याचा माल आहे, त्यानेच आडत्याशी चर्चा करावी. इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. बाजार समितीने दोषी व्यापा-यांसह शेतक-यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा, पुढील लिलाव होणार नाहीत.-अजित लोहाडे, व्यापारी.