शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पीकविम्याबाबत शेतकर्‍यांचे प्रबोधन करणे गरजेचे

By admin | Updated: June 4, 2024 19:34 IST

संगमनेर : दुष्काळग्रस्त संगमनेर तालुक्यात पीक विम्याबाबत जागृतीची गरज व्यक्त करून शेतकर्‍यांनी खरीप पिकांसाठी आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर : दुष्काळग्रस्त संगमनेर तालुक्यात पीक विम्याबाबत जागृतीची गरज व्यक्त करून शेतकर्‍यांनी खरीप पिकांसाठी आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने जिल्हा बँकेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक झाली. बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँक अध्यक्ष बाजीराव खेमनर, रामदास वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने उपस्थित होते. थोरात म्हणाले, शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून सव्वाशे कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरवून निर्यात केली जाते. आगामी काळात रासायनिक खतांचा काळाबाजार व राजकारण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. बियाणे प्रक्रिया, कमीत कमी खताचा वापर यासाठी गावोगावी बैठकांद्वारे जनजागृती होण्याची गरज आहे. जिरायत भागात जलसंधारणाचे महत्व शेतकर्‍यांना पटवून दिले पाहिजे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी खरीप पिकांसाठी आधुनिक प्रणालीचा वापर करून पीक विमा उतरविण्याचे आवाहन थोरात यांनी केले. तांबे यांनी ठिबक सिंचनाचे महत्व विषद करून महागाईमुळे शेतकर्‍यांनी स्वत: खत निर्मिती करण्याचे मत व्यक्त केले. बैठकीस प्रांताधिकारी संदीप निचित, तहसीलदार शरद घोरपडे, पद्मा थोरात, मिनाक्षी थोरात, अर्चना बालोडे, दिप्ती सांगळे, आरती दिघे, सुरेश थोरात, बाळासाहेब पवार, प्रभाकर कांदळकर आदी उपस्थित होते. उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)