शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: October 18, 2024 18:55 IST

सोबलेवाडी येथील शेतकरी बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याने आमदार विजय औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

पारनेर : तलाठ्याच्या दिरंगाईमुळे राज्य सरकारकडून आलेले नांगरट व मशागतीचे अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ सोबलेवाडी येथील शेतकरी बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याने आमदार विजय औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर शेतकऱ्याला अटक करण्यात आली. गुरूवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, पारनेर जवळील सोबलेवाडी येथील बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावावर दुष्काळामुळे राज्य सरकारने दिलेले नांगरटीचे व मशागतीचे अनुदान वर्गच झाले नाही. तलाठ्याकडून काही चुका झाल्याने अनुदान रखडले व सोबलेवाडी येथील इतर शेतकऱ्यांना अनुदान मिळाले, अशी सोबले यांची तक्रार आहे. गुरूवारी सकाळी अकरा वाजता बबन सोबले यांनी पारनेर येथील वेशीनजीक असलेल्या आमदार औटी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांना माहिती दिली. औटी यांनीही तातडीने याची दखल घेऊन तहसील कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी शेतकरी सोबले कार्यालया बाहेर गेले व हातातील रॉकेलच्या बाटलीतून रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.ही घटना पाहताच आ. औटी यांचे स्वीय सहाय्यक योगेश वाघ, चालक आयाज राजे, गिरीश साळवे यांनी तातडीने शेतकऱ्याच्या हातातील रॉकेलची बाटली व काडीपेटी काढून घेतली.घटनेनंतर पारनेर पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी योगेश वाघ यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार सोबले यांच्यावर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अनुदान मिळणे कठीणशेतकरी बबन सोबले यांनी जरी आत्मदहनाचा प्रयत्न केला तरी पारनेरच्या तलाठ्याची बदली झाल्याने तेथे नवीन तलाठयाची नेमणूक आहे. नवीन तलाठी अजून हजर नसल्याने सोबले यांना सध्यातरी हे अनुदान तातडीने मिळणे अवघड आहे. (तालुका प्रतिनिधी)पहिल्यांदा भेटबबन सोबले नांगरट व मशागतीचे अनुदान मिळाले नाही म्हणून पूर्वी आमदार औटी यांना भेटले नाहीत. गुरूवारी प्रथमच ते संपर्क कार्यालयात आले व त्यानंतर त्यांनी हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला.योगेश वाघ,आ.औटी यांचे स्वीय सहाय्यकटोलवाटोलवीमी माझे व वडिलांच्या नावावरील मशागत व नांगरटीचे अनुदान बँकेत जमा नाही म्हणून पारनेरच्या तलाठ्याकडे चौकशी केली. त्यावेळी अनुदान बँकेत वर्ग झाल्याचे सांगण्यात आले. बँकेत गेल्यावर अजून तुमचा धनादेश आला नाही, असे सांगण्यात येत होते.यामुळे वैतागून आत्मदहनाचा प्रयत्न केला.बबन सोबले,आंदोलक शेतकरी