शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते विखे यांच्या लोणीत शेतक-यांचा उद्यापासून आत्मक्लेश; प्रशासनाने परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 19:45 IST

साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावत आत्मक्लेष करणारच आणि तोही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोरच, असा इशारा देत ऊस उत्पादक शेतकरी संषर्घ समितीने सरकारसह कारखानदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशन काळातच ऊसदराचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावत आत्मक्लेष करणारच आणि तोही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोरच, असा इशारा देत ऊस उत्पादक शेतकरी संषर्घ समितीने सरकारसह कारखानदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशन काळातच ऊसदराचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा नियोजन भवनात साखर कारखानदारांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिका-यांची संयुक्त बैठक पार पडली. प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, शिर्डीचे प्रांतअधिकारी रवींद्र ठाकरे आदी बैठकीला उपस्थित होते. ऊसाला ३५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी उपोषण करण्याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वीच निवेदन दिलेले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी ही संयुक्त बैठक बोलविली होती. मात्र बैठकीत ऊसदराबाबत तोडगा न निघाल्याने संघर्ष समिती आंदोलनावर ठाम आहे. संघटनांनी आत्मक्लेष करण्यासाठी सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरील जागा निवडली आहे. या जागेत कुणीही आंदोलन करू नये, असा ठराव ३१ मार्च २०१४ मध्ये लोणी ग्रामपंचायतीने केलेला आहे. याची कल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बैठकीच्या शेवटी समितीच्या पदाधिका-यांना दिली. मात्र जागेच्या मुद्यावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे डॉ. अजित नवले यांनी शेतक-यांच्या वतीने प्रशासनाला ठणकावून सांगितले. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नवले म्हणाले, आत्मक्लेष करण्याबाबत प्रशासनाला रितसर निवेदन दिलेले आहे. उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी आम्ही सर्वचजण गुरुवारी सकाळी तिथे जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी अटक केल्यास जेलमध्येही आत्मक्लेष केले जाईल. उपोषणाला राज्यातील ११ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील दररोज किमान ४०० ते ५०० शेतकरी उपोषणाला हजेरी लावतील, असे नवले यांनी यावेळी सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे बाळासाहेब पटारे, कॉ़ बन्सी सातपुते, अजय महाराज बारस्कर, संतोष वाडेकर, अनिल देठे, हरिभाऊ तुवर, रवींद्र मोरे, अनिल इंगळे, विलास कदम, रुपेंद्र काले, चांगदेव विखे, अशोक पठारे, शिवाजी जवरे, युवराज जगताप, अनिल औताडे, रावसाहेब लवांडे, बच्चू मोढवे, ताराभाऊ लोंढे, खंडू वाकचौरे, अशोक सब्बन आदी बैठकीला उपस्थित होते.