शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

विरोधी पक्षनेते विखे यांच्या लोणीत शेतक-यांचा उद्यापासून आत्मक्लेश; प्रशासनाने परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 19:45 IST

साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावत आत्मक्लेष करणारच आणि तोही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोरच, असा इशारा देत ऊस उत्पादक शेतकरी संषर्घ समितीने सरकारसह कारखानदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशन काळातच ऊसदराचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावत आत्मक्लेष करणारच आणि तोही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोरच, असा इशारा देत ऊस उत्पादक शेतकरी संषर्घ समितीने सरकारसह कारखानदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशन काळातच ऊसदराचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा नियोजन भवनात साखर कारखानदारांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिका-यांची संयुक्त बैठक पार पडली. प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, शिर्डीचे प्रांतअधिकारी रवींद्र ठाकरे आदी बैठकीला उपस्थित होते. ऊसाला ३५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी उपोषण करण्याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने यापूर्वीच निवेदन दिलेले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी ही संयुक्त बैठक बोलविली होती. मात्र बैठकीत ऊसदराबाबत तोडगा न निघाल्याने संघर्ष समिती आंदोलनावर ठाम आहे. संघटनांनी आत्मक्लेष करण्यासाठी सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरील जागा निवडली आहे. या जागेत कुणीही आंदोलन करू नये, असा ठराव ३१ मार्च २०१४ मध्ये लोणी ग्रामपंचायतीने केलेला आहे. याची कल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बैठकीच्या शेवटी समितीच्या पदाधिका-यांना दिली. मात्र जागेच्या मुद्यावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे डॉ. अजित नवले यांनी शेतक-यांच्या वतीने प्रशासनाला ठणकावून सांगितले. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नवले म्हणाले, आत्मक्लेष करण्याबाबत प्रशासनाला रितसर निवेदन दिलेले आहे. उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी आम्ही सर्वचजण गुरुवारी सकाळी तिथे जाणार आहोत. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी अटक केल्यास जेलमध्येही आत्मक्लेष केले जाईल. उपोषणाला राज्यातील ११ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील दररोज किमान ४०० ते ५०० शेतकरी उपोषणाला हजेरी लावतील, असे नवले यांनी यावेळी सांगितले. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे बाळासाहेब पटारे, कॉ़ बन्सी सातपुते, अजय महाराज बारस्कर, संतोष वाडेकर, अनिल देठे, हरिभाऊ तुवर, रवींद्र मोरे, अनिल इंगळे, विलास कदम, रुपेंद्र काले, चांगदेव विखे, अशोक पठारे, शिवाजी जवरे, युवराज जगताप, अनिल औताडे, रावसाहेब लवांडे, बच्चू मोढवे, ताराभाऊ लोंढे, खंडू वाकचौरे, अशोक सब्बन आदी बैठकीला उपस्थित होते.