शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

शेतकरी संघटना लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविणार : रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:14 IST

खोटे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. आज मोदी सरकार सत्तेवर येऊन शेतकरी विरोधी भुमिका घेत असून यामध्ये शेतकरी भरडला जात आहे.

राहाता : खोटे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. आज मोदी सरकार सत्तेवर येऊन शेतकरी विरोधी भुमिका घेत असून यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. शेतमालाच्या प्रश्नावर काँग्रेस नेते गप्प आहे. आता शेतकरी संघटनेलाच यासाठी पर्याय उभा करावा लागणार आहे. त्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुका शेतकरी संघटना लढविणार आहे, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. राहात्यामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.रघुनाथदादा पाटील म्हणाले, यापुर्वी राज्यात व देशात काँग्रेसचे सरकार होते. गेल्या पाच वर्षांपासुन भाजपचे सरकार आहे. वेळोवेळी सरकारे बदलली गेली. परंतु धोरणे बदलली जात नाही. पाकिस्तानातुन कांदा ४८ रुपये किलो दराने आयात केला. शहरी लोकांना शेतमाल स्वस्तात विकुन खुश करण्याचे काम हे सरकार करत आहे. कांद्याला भाव बांधुन द्यायला सरकार तयार नाही. मगरी, बिबटे, वाघ, ससे, कुत्रे यांना अभय देण्यासाठी सरकारने कायदे केले आहे. परंतु शेतक-यांना अभय देण्यासाठी कायदा नाही. न्यायालय या प्रश्नात लक्ष घालण्यास तयार नाही. या सर्व बाबींवर शेतक-यांची मुले आता विचार करत आहे. ऊसाच्या भावाच्या संदर्भात काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी प्रमाणे भाव देता येणार नाही यात सुट मिळावी, अशी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. केंद्र सरकारच्या एफआरपी कायद्यापेक्षा शेतक-यांना कमी भाव देता येणार नाही, असे न्यायालयाने त्यांना सुनावले आहे.गुजरातमध्ये ४ हजार ४४१ रुपये प्रतिटन शेतक-यांच्या ऊसाला भाव दिला जातो. परंतु येथे एफआरपीप्रमाणे शेतक-यांना भाव दिला जात नाही. एफआरपीचे पैसे १४ दिवसांत शेतक-यांना मिळत नाही. साखर आयुक्त कारवाई करतात, सहकार मंत्री त्याला स्टे देतात. त्यामुळे साखर कारखानदारांना कायद्याचा धाक राहीला नाही. ८० टक्के एफआरपी दिली तरी चालेल, अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भुमिका कारखानदारांना अभय देते. बाजार समित्यात विकलेल्या शेतमालाचे २४ तासाच्या आत शेतक-यांना पैसे मिळत नाही. संघर्षयात्रेत शेतक-यांच्या प्रश्नांवर काँग्रेस नेते गप्प आहेत. शेतक-यांच्या आत्महत्त्या हा प्रश्न या सरकारला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्त्येचा हा कलंक पुसण्यासाठीच शेतकरी संघटनेने लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.त्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची व पदाधिका-यांची बैठक संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. परिषदेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठातील संघटनेचे वकिल अँड.अजित काळे, क्रांतीसिंह नानापाटील ब्रिगेडचे अध्यक्ष नानासाहेब नांदखिले, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख बाळासाहेब पठारे, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव जवरे, जिल्हाध्यक्ष अशोक पठारे, जिल्हा सचिव रुपेंद्र काले, खजिनदार विलास कदम, श्रीरामपुर तालुकाध्यक्ष विलास कदम, राहुरी तालुकाध्यक्ष नारायण टेकाळे, राहाता तालुकाध्यक्ष चांगदेव विखे, अनिल औताडे, बाबासाहेब खर्डे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता