शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अपहरण करून शेतक-याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:06 IST

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गुरूवारी रात्री अपहरण झालेल्या शेतक-यांचा सहा ते सात जणांनी निर्घूण खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील घटनापोलीसांनी वेळीच घेतली नाही दखल

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गुरूवारी रात्री अपहरण झालेल्या शेतक-यांचा सहा ते सात जणांनी निर्घूण खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकिस आली.अशोक रभाजी शेंडे (वय ४५) असे खून झालेल्या शेतक-याचे नाव आहे. आडगाव येथे दोन दिवसांपूर्वी शेंडे कुटुंबिय व त्यांच्या शेजारी राहत असलेल्या कुटुंबासोबत वाद झाला होता. याबाबत शेंडे कुटुुंबियांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.पोलीसांनी मात्र या प्रकरणाची काहीच दखल घेतली नाही. गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अशोेक शेंडे हे त्यांच्या शेतात गेले तेव्हा सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले़ ही बाब अशोक यांच्या कुटुंबियांनी समजली तेव्हा त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांना फिर्याद घेण्याची विनंती पोलीसांनी केली मात्र प्रथम फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली़ शेंडे कुटुंबयांनी विनंती केली तेव्हा पोलीसांनी त्यांना जबरदस्तीने दोन ते अडिच तास पोलीस ठाण्यात बसवून घेतले. त्यानंतर फिर्याद दाखल केली. अपहरण झालेल्याचा तातडीने शोध घ्यावा, अशी विनंती पोलीसांना केली तेव्हा सध्या मनुष्यबळ कमी आहे. पोलीस उपलब्ध होतील तेव्हा शोध घेऊ, असे पोलीसांनी सांगितले़ अखेर अपहरण झालेल्या अशोक शेंडे याचा खून करून त्यांचा मृतदेह मारेक-यांनी लोहसर-धारवाडी (ता. पाथर्डी) परिसरात आणून टाकला़ हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी