शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वीज बिले भरण्यासाठी कामरगावचे शेतकरी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:21 IST

निंबळक : कृषिपंपाच्या थकबाकीबाबत महावितरण अधिकाऱ्यांसोबत कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी शेतकऱ्यांसमवेत एकत्रित चर्चा घडवून आणली. शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच ...

निंबळक : कृषिपंपाच्या थकबाकीबाबत महावितरण अधिकाऱ्यांसोबत कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी शेतकऱ्यांसमवेत एकत्रित चर्चा घडवून आणली. शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये भरून एका दिवसात जवळपास आठ लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे महावितरणने कृषिपंप सुरू केले.

महावितरणाच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देताच कृषिपंप चालू झाले.

कामरगाव येथील शेतावर असलेल्या विहिरी व विंधन विहिरींवरील कृषिपंपांची थकीत असणारी वीज बिले वसुलीसाठी महावितरण कंपनीने रोहित्र (डीपी) बंद केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी करपू लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ही बाब सरपंच तुकाराम कातोरे यांनी महावितरणचे केडगाव विभागाचे सहायक अभियंता रामदास ढाकणे यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यांच्या सोबत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सहविचार सभा आयोजित केली. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषिपंपांची किमान पाच हजार रुपये रक्कम भरावी, असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार शेतकऱ्यांनी थकीत रक्कम लगेच भरली. त्यानंतर महावितरणचे कर्मचारी संभाजी गायकवाड, विजय शिरसाठ, योगेश दळवी यांनी बंद केलेली सर्व रोहित्रे (डीपी) सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या गावात ४५ रोहित्रे (डीपी) असून, ३३० ग्राहक आहेत. त्यातील बहुतेकांनी जवळपास ८ लाख रुपयांचा भरणा महाविरणकडे केला.

यावेळी माजी सरपंच वसंत ठोकळ, ग्रामपंचायत सदस्य संदीप ढवळे, आजी- माजी सैनिक संघटना अध्यक्ष प्रकाश ठोकळ, अनिल आंधळे, संदीप लष्करे, सिद्धांत आंधळे, विधितज्ज्ञ प्रशांत साठे, प्रा. मारुती आंधळे, पोपट ठोकळ, लक्ष्मण ठोकळ, जयसिंग ठोकळ, अरुण शिंदे, नितीन ठोकळ, अरुण ठोकळ, बाळासाहेब साठे मेजर आदी उपस्थित होते.