शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: August 27, 2014 23:08 IST

मुळा नदीत मुळा धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.

नेवासा : मुळा नदीवरील मानोरी, पानेगाव-मांजरी, वांळुजपोई- अंमळनेर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात धरणाचे पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी मुळा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी पानेगाव-मांजरी येथील नदीपात्रात मंगळवारपासून सुरु केलेले उपोषण बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरु होते. मुळा नदीत मुळा धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.मुळा नदीवरील मानोरी, पानेगाव-मांजरी, पांजुळपोई, अंमळनेर हे तीन बंधारे मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांची जीवनरेषा आहे. याच बंधाऱ्यावर या भागातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. मुळा धरणातून या तीनही बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. याची दखल संबंधित खात्याने न घेतल्याने आज परिस्थिती भयानक व दुष्काळसदृश झाली आहे, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या भागातील विहिरी, कुपनलिका कोरड्या आहेत. तीन वर्षापासून बंधाऱ्यात पाणीसाठा झालेला नाही. सध्या मुळा धरणात २० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याने मुळा नदीवरील तीनही बंधारे भरणे गरजेचे होते. येथील सिंचन प्रश्न या बंधाऱ्यावरच अवलंबून असल्याने जनावरांसह पिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी येईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असे या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. मुळा धरणातून वर्षातून बंधाऱ्यांना पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.उपोषणाचे नेतृत्व नेवासा तालुक्यातील शिरेगावचे सरपंच किरण जाधव, पानेगावचे उपसरपंच डॉ.जयवंत गुडघे, मुळाथडी पाणी हक्क आरक्षण कृती समितीचे उपाध्यक्ष विलास सैंदोरे, नानासाहेब जुंधारे करीत आहेत. उपोषणकर्त्यांची माजी आ़ भानुदास मुरकुटे, नेवासा तालुक्याचे ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, बाळासाहेब मुरकुटे, साहेबराव घाडगे, उत्तमराव म्हसे, बाळासाहेब पवार यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. (तालुका प्रतिनिधी)