शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: August 27, 2014 23:08 IST

मुळा नदीत मुळा धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.

नेवासा : मुळा नदीवरील मानोरी, पानेगाव-मांजरी, वांळुजपोई- अंमळनेर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात धरणाचे पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी मुळा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी पानेगाव-मांजरी येथील नदीपात्रात मंगळवारपासून सुरु केलेले उपोषण बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरु होते. मुळा नदीत मुळा धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.मुळा नदीवरील मानोरी, पानेगाव-मांजरी, पांजुळपोई, अंमळनेर हे तीन बंधारे मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांची जीवनरेषा आहे. याच बंधाऱ्यावर या भागातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. मुळा धरणातून या तीनही बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. याची दखल संबंधित खात्याने न घेतल्याने आज परिस्थिती भयानक व दुष्काळसदृश झाली आहे, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या भागातील विहिरी, कुपनलिका कोरड्या आहेत. तीन वर्षापासून बंधाऱ्यात पाणीसाठा झालेला नाही. सध्या मुळा धरणात २० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याने मुळा नदीवरील तीनही बंधारे भरणे गरजेचे होते. येथील सिंचन प्रश्न या बंधाऱ्यावरच अवलंबून असल्याने जनावरांसह पिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी येईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असे या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. मुळा धरणातून वर्षातून बंधाऱ्यांना पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.उपोषणाचे नेतृत्व नेवासा तालुक्यातील शिरेगावचे सरपंच किरण जाधव, पानेगावचे उपसरपंच डॉ.जयवंत गुडघे, मुळाथडी पाणी हक्क आरक्षण कृती समितीचे उपाध्यक्ष विलास सैंदोरे, नानासाहेब जुंधारे करीत आहेत. उपोषणकर्त्यांची माजी आ़ भानुदास मुरकुटे, नेवासा तालुक्याचे ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, बाळासाहेब मुरकुटे, साहेबराव घाडगे, उत्तमराव म्हसे, बाळासाहेब पवार यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. (तालुका प्रतिनिधी)