शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

खतांची दरवाढीचा फेरविचार करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शेतकरी संघटनेने खतांच्या नियंत्रणमुक्तीचे समर्थन केले आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना कायमस्वरूपी खतावर अनुदान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शेतकरी संघटनेने खतांच्या नियंत्रणमुक्तीचे समर्थन केले आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना कायमस्वरूपी खतावर अनुदान मिळावे, असा नाही. परंतु, आपत्तीच्या काळात रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांना झेपणारी नाही. त्यामुळे खतांच्या दरवाढीबाबत सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

भारतात रासायनिक खते फारशी तयार होत नाहीत. बहुतेक कच्चा माल आयात करावा लागतो. डीएपीसारखी तयार खतेच आयात केली जातात. पालाश (पोटॅश) आपल्या देशात मिळत नाही. ते इस्त्राईल, जॉर्डन, कॅनडा या देशांतून आयात करावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती वाढल्या आहेत. खत निर्मितीसाठी लागणारे पेट्रोलियम व इतर पदार्थांच्या किमतीतही वाढ झाली आहे. पाश्चिमात्त्य देशात गेल्यावर्षी सोयाबीन व मक्याला चांगले दर मिळाले. तसेच येणाऱ्या हंगामात हवामान पोषक असल्याचा अंदाज आहे. खतांच्या दरवाढीमागे हेही एक कारण आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमतसुद्धा आयात खताच्या किमतीवर परिणाम करीत असते. मागील वर्षाच्या तुलनेत चालूवर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमती वाढल्या आहेत. भारतातील खत उत्पादकांना या दरानेच आयात करावी लागते. खतांच्या किमती वाढल्या म्हणून प्रगत राष्ट्रांमध्ये भाव कमी करण्यासाठी आंदोलन होत नाहीत. भारतात मात्र उद्रेक होतो. इतर देशांमध्ये कच्चा माल महाग झाल्याने खतांच्या किमती वाढतात. त्यानुसार शेतीमालही चढ्या भावाने विकण्याची सोय आहे. भारतात मात्र उत्प‍ादन खर्च वाढला तरी शेतीमाल स्वस्तच मिळाला पाहिजे, अशी भूमिका आहे. शेतीमालाला खुल्या बाजारातील दर मिळू दिले तर शेतकरी वाढीव दराने खते विकत घेऊ शकतील. शेतीमालाचे दर नियंत्रित करण्याचे सरकारचे धोरण या परिस्थितीस कारणीभूत आहे. ते सुधारण्याची गरज आहे. जोपर्यंत सरकार शेतीमालाच्या मालाच्या किमती नियंत्रित करणार आहे, तोपर्यंत शेतकरी शेती निविष्ठांसाठी सवलती मागणारच आहे, असे घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.