शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे २९ कोटी पडून

By admin | Updated: October 27, 2016 00:51 IST

अहमदनगर : मागील वर्षीच्या खरिपाचे अनुदान तहसील कार्यालयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत़ मात्र महिना उलटूनही हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झिरपलाच नाही़

अहमदनगर : मागील वर्षीच्या खरिपाचे अनुदान तहसील कार्यालयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत़ मात्र महिना उलटूनही हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झिरपलाच नाही़ सरकारने दिलेले २९ कोटींचे अनुदान वाटपाविना पडून आहे़ ऐन दिवाळीतही पैसे बँक खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळीवर संक्रांत आली आहे़ मागीलवर्षी जिल्ह्यात भयंकर दुष्काळ होता़ रब्बी व खरिपाचे पीक हाती आले नाही़ दोन्ही हंगाम वाया गेले़ पिकांवर केलेला खर्चही वसूल झाला नाही़ सरकारने रब्बी व खरिपाची नुकसान भारपाई दिली़ रब्बीसाठी केंद्र सरकारने १ हजार ५०० कोटी जाहीर केले़ मात्र या या निधीतून एक खडकूही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही़ रब्बीचा निधी राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे तिजोरीत अडकून पडला आहे़ यावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नी असलेली सरकारची उदासीनता समोर आली़ त्याला प्रशासनही अपवाद नाही़ सरकारप्रमाणेच प्रशासन दुष्काळप्रश्नी उदासीनच असल्याचे खरीप अनुदान वाटपाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ सरकारने सन २०१५ मधील खरिपाचे अनुदान तीन टप्प्यात दिले़ पहिल्या दोन टप्प्यांतील निधी १०० टक्के वाटप झाला़ तिसऱ्या टप्प्यात १७ सप्टेंबर रोजी सरकारने ३१ कोटी १० लाख जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले़ जिल्हा प्रशासनाने ते तहसील कार्यालयांकडे वर्ग केले़ तहसील कार्यालयांनी ३१ कोटी पैकी २ कोटी अनुदानाचेच फक्त वाटप केले़ उर्वरित २९ कोटी २७ लाख तहसील कार्यालयांच्या खात्यावर पडून आहेत़ तहसील कार्यालयाने प्राप्त झालेल्या निधीवर गेल्या महिनाभरात कार्यवाही केली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे पैसे महिना उलटूनही मिळाले नाही़ किमान दिवाळीत तरी खरिपाचे पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती़ परंतु, स्थानिक अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे पैसे प्रशासनाच्याच खात्यावर पडून आहेत़ शेतकरी मात्र या पैशांसाठी बँकेत चकरा मारत आहेत़ पैसे आले नाही, असे उत्तर त्यांना बँकेकडून दिले जात आहे़