शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

शेतकऱ्यांचे २९ कोटी पडून

By admin | Updated: October 27, 2016 00:51 IST

अहमदनगर : मागील वर्षीच्या खरिपाचे अनुदान तहसील कार्यालयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत़ मात्र महिना उलटूनही हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झिरपलाच नाही़

अहमदनगर : मागील वर्षीच्या खरिपाचे अनुदान तहसील कार्यालयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत़ मात्र महिना उलटूनही हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झिरपलाच नाही़ सरकारने दिलेले २९ कोटींचे अनुदान वाटपाविना पडून आहे़ ऐन दिवाळीतही पैसे बँक खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळीवर संक्रांत आली आहे़ मागीलवर्षी जिल्ह्यात भयंकर दुष्काळ होता़ रब्बी व खरिपाचे पीक हाती आले नाही़ दोन्ही हंगाम वाया गेले़ पिकांवर केलेला खर्चही वसूल झाला नाही़ सरकारने रब्बी व खरिपाची नुकसान भारपाई दिली़ रब्बीसाठी केंद्र सरकारने १ हजार ५०० कोटी जाहीर केले़ मात्र या या निधीतून एक खडकूही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही़ रब्बीचा निधी राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे तिजोरीत अडकून पडला आहे़ यावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नी असलेली सरकारची उदासीनता समोर आली़ त्याला प्रशासनही अपवाद नाही़ सरकारप्रमाणेच प्रशासन दुष्काळप्रश्नी उदासीनच असल्याचे खरीप अनुदान वाटपाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ सरकारने सन २०१५ मधील खरिपाचे अनुदान तीन टप्प्यात दिले़ पहिल्या दोन टप्प्यांतील निधी १०० टक्के वाटप झाला़ तिसऱ्या टप्प्यात १७ सप्टेंबर रोजी सरकारने ३१ कोटी १० लाख जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले़ जिल्हा प्रशासनाने ते तहसील कार्यालयांकडे वर्ग केले़ तहसील कार्यालयांनी ३१ कोटी पैकी २ कोटी अनुदानाचेच फक्त वाटप केले़ उर्वरित २९ कोटी २७ लाख तहसील कार्यालयांच्या खात्यावर पडून आहेत़ तहसील कार्यालयाने प्राप्त झालेल्या निधीवर गेल्या महिनाभरात कार्यवाही केली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे पैसे महिना उलटूनही मिळाले नाही़ किमान दिवाळीत तरी खरिपाचे पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती़ परंतु, स्थानिक अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे पैसे प्रशासनाच्याच खात्यावर पडून आहेत़ शेतकरी मात्र या पैशांसाठी बँकेत चकरा मारत आहेत़ पैसे आले नाही, असे उत्तर त्यांना बँकेकडून दिले जात आहे़