शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मि‌ळाली नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST

अकोले : तालुक्यात निसर्गाची मुक्त उधळण असतानाही मर्यादित उपजीविकेची साधने, कमी असलेली उपजावू जमीन यामुळे आदिवासी शेतकरी आर्थिक अडचणी ...

अकोले : तालुक्यात निसर्गाची मुक्त उधळण असतानाही मर्यादित उपजीविकेची साधने, कमी असलेली उपजावू जमीन यामुळे आदिवासी शेतकरी आर्थिक अडचणी येत असे. परंतु गेल्या वर्षभरापासून तालुका कृषी विभागाने ‘आत्मा’च्या सहभागातून आदिवासी शेतकरी यांच्या साथीने मसाले पीक, फणस-चारोळी लागवड, उन्हाळी नाचणी असे प्रयोग राबवून विकासाची नवी दिशा दाखवली आहे.

काळे सोने मिरी मसाले पीक २६ आदिवासी शेतकरी यांच्या सहभागातून धामणवन परिसरात ३ गावांत १ हजार ४३९ रोपे लावण्यात आली आहेत. १० ते १५ फुटांचे वेल झाले असून, पुढील वर्षी त्यास फळे लगडण्याची शक्यता आहे.

आदिवासी बांधवांना फणस गरे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. फणसाची उपलब्धता वाढावी म्हणून ८ गावांतील ३१ शेतकऱ्यांच्या सहकार्याने २७० कलमी फणसाची लागवड करण्यात आली आहे. आता ती झाडे ३ ते ४ फूट उंचीची झाली आहेत. १ फणस १००० रुपये उत्पन्न देऊ शकते. चारोळीसारखे जंगली पीक येथील जंगलात रुजविण्याचा प्रयत्न सुरू असून, यासाठी नंदुरबार तालुक्यातून अक्राणी येथून ११० रोपे गतवर्षी आणून ४ गावांतील १६ शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली आहे. हीच चारोळी मोठी होऊन हिरड्याच्या बरोबरीने उत्पन्न देणार आहे.

त्याचबरोबर आसामी जांभळ्या भाताची ४ गावांत ६ एकर क्षेत्रावर लागवड करून या वर्षासाठी २८०० किलो बियाणे तयार झाले आहे. उन्हाळी नाचणीचा नावीन्यपूर्ण प्रयोग खडकी या गावातील २६ युवक शेतकरी यांनी ९ एकर क्षेत्रावर गटाच्या सहभागातून राबविला आहे. रायवळ आंब्यापासून आमचूर तयार करण्याचे मोठे अभियान सुरू करण्यात आले. ५ गावांत तसे कार्यक्रम घेण्यात आले. नंदुरबार येथील दिवाळकी तुरीचे १० किलो बियाणे १९ गावांत देण्यात आले. या वर्षासाठी १२० किलो बियाणे तयार झाले आहे.

धामणवन येथील शांताराम बारामते यांनी उन्हाळी भात, ठिबकवर उन्हाळी नाचणी, शेततळ्यात मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन असे प्रयोग केले. या उन्हाळ्यात कलिंगड व मिरची यांची थेट बाजारात नेऊन विक्री केल्याने चांगला आर्थिक फायदा झाला आहे. हनुमान पुरुष आदिवासी गट विविध प्रयोगासाठी पुढे सरसावला असून, १५ शेतकऱ्यांनी या वर्षी आसामी जांभळा भात १०० एकर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन केले आहे. मिरी पिकामध्ये लवकर उत्पादन येण्यासाठी शेडनेटमध्ये बुश टाईप मिरीची प्रात्यक्षिक लागवड केली जाणार आहे. फुलशेतीमध्ये झेंडू व शेवंतीबरोबर निशिगंध लागवड करून प्रक्रिया केंद्राशी जोडले जाणार आहे.

......

शेतकऱ्यांचा कोकणातील पीक अभ्यास दौरा फायदेशीर ठरला. तालुक्यात कोकणासारखे वातावरण असल्याने आदिवासी शेतकरी मसाले पीक मिरी व फणस-चारोळी लागवड करू लागला आहे. उन्हाळा नाचणी, जांभळा भात व बांधावरील फळबाग शेती आदिवासींच्या आर्थिक उन्नतीचे साधन बनले आहे.

- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी

..........