शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

झटपट येणाऱ्या सोयाबीनमुळे शेतकरी मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST

अहमदनगर : गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनला पसंती दिली. मात्र सोयाबीनच्या बियाणांतही आता लवकर ...

अहमदनगर : गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनला पसंती दिली. मात्र सोयाबीनच्या बियाणांतही आता लवकर येणारे, मध्यम कालावधीत येणारे, उशिरा येणारे बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला अथवा जास्त झाला तरी, शेतकरी मालामाल होत आहे. त्यातच यंदा भावही चांगल्या प्रकारे मिळत आहे.

यंदाच्या हंगामात वेळेवर पाऊस पडला. त्यातच सोयाबीनला विक्रमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी या पिकाकडे वळले. जिल्ह्यात तब्बल ९९ हजार ४१७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. यंदा शेतकऱ्यांनी बाजरी, कपाशी या पिकांच्या तुलनेत सोयाबीनला प्राधान्य दिले.

-----

सोयाबीनचा पेरा हेक्टरमध्ये...

वर्ष पेरा

२०१७ ७५१७४

२०१८ ८९८४४

२०१९ ५२२८२

२०२० ५४२९४

२०२१ ९९४१७

-----

झटपट येणारे सोयाबीन...

जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात सोयाबीनच्या लागवडीस प्रारंभ होतो. झटपट येणाऱ्या सोयाबीनच्या बियाणाची लागवड केल्यानंतर तीन महिन्यात हे पीक काढण्याच्या स्थितीत येते. त्यामुळे सुरुवातीला व मध्ये केव्हाही पाऊस झाला तरी, या पिकाला फायदाच होतो.

---

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन...

मध्यम कालावधीत येणाऱ्या सोयाबीनची लागवडही जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू होते. लागवड केल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सोयाबीन काढणीस येते. यंदा पाऊस लांबल्याने पिकाच्या उत्पादनात मात्र घट होणार आहे. मात्र भाव चांगला मिळाल्यास दिलासा मिळेल.

-----

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन...

या सोयाबीनचा कालावधी पूर्ण चार महिन्यांचा असतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्यास त्याची काढणी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या महिन्यात होते. जास्त कालावधीच्या सोयाबीन पिकाला परतीच्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी या पिकाला टाळत असल्याचे दिसते.

----

सोयाबीन हे पीक अल्प पावसातही तग धरून राहते. त्यामुळे आम्ही याच पिकाला प्राधान्य देतो. तसेच गेल्या दोन हंगामापासून पिकाला भावही चांगला मिळतो आहे. यंदाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनपासून चांगले पैसे मिळतील.

- रोहिदास शिंदे,

शेतकरी

-----

गेल्या पाच वर्षांपासून सोयाबीनची लागवड करतोय. सुरुवातीची काही वर्षे अपेक्षित भाव मिळाला नाही. मात्र आता सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. यंदा हवामानाच्या बदलामुळे उत्पादनात घट होईल. मात्र चांगला भाव असल्यामुळे पैसेही चांगले मिळतील. त्यामुळे इतर पिकांपेक्षा हे पीक परवडेल.

- भाऊ जाधव,

शेतकरी