शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास करून आलेली कुटुंब होताहेत पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : बाहेरगावी प्रवास करून आलेली कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे महापालिकेच्या चाचणीतून समोर आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : बाहेरगावी प्रवास करून आलेली कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे महापालिकेच्या चाचणीतून समोर आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी महापालिकेने चाचण्यांची मोहीम हाती घेतली आहे. या चाचणीमध्ये जे कुटुंब बाहेरगावाहून प्रवास करून शहरात आले, ते कोरोनाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे शक्यताे नागरिकांनी प्रवास टाळणे आवश्यक आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिकेेकडून करण्यात आले आहे.

ज्या भागात पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागात महापालिकेने कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. घरातील ५ ते ६ जण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यापूर्वी एकाच घरातील सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, अलिकडे संपूर्ण कुटुंब कोरोनाचे बळी ठरत असून, या काळात प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

महापालिकेने शहरात १९ ठिकाणे बंद केली आहेत. कंटेन्मेंट करताना एक किंवा दोन घरे, एवढा भाग बंद करण्यात येतो. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेने नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चार भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकाने रविवारी २७ जणांवर कारवाई केली आहे. सर्व खासगी कार्यालयांत ५० टक्के कर्मचारी उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, शहरात बाहेर जाणाऱ्यांचे आणि बाहेरून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

....

भरारी पथकाचे प्रमुख पॉझिटिव्ह

सोशल डिस्टन्सिंग, मास्क आदी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने चार पथके स्थापन केली आहेत. दोन पथकांच्या प्रमुखांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

....

- प्रवास करून आलेले कुटुंब कोरोनाचे बळी ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो बाहेरगावचा प्रवास टाळावा. तसेच सामाजिक अंतर, मास्क् आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

- शंकर गोरे, आयुक्त