शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

शेतकऱ्यांची चाड्यावर मूठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 01:25 IST

अहमदनगर : आर्द्रा नक्षत्रातील दमदार पावसाच्या जोरावर जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील शेतकरी सुखावला आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली

अहमदनगर : आर्द्रा नक्षत्रातील दमदार पावसाच्या जोरावर जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील शेतकरी सुखावला आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून वाफसा झालेल्या ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत. गुरूवारपासून कृषी विभागाने खरीप हंगामातील पेरणीची आकडेवारी संकलित करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात नगर, कर्जत, जामखेड, पाथर्डी या ठिकाणी २५ हजार २९० हेक्टवर कडधान्यांची आणि ३ हजार ३६६ हेक्टवर तेलबिया पिकाची पेरणी झालेली आहे. पेरणीची टक्केवारी ७ टक्के आहे.यंदा सुरूवातीच्या टप्प्यात पावसाने ताण दिल्याने शेतकरी, बियाणे, खते आणि किटक नाशक विक्रेते अडचणीत आले होते. नगरच्या बाजारपेठेत साधारण २०० कोटी रुपयांचे बियाणे पडून होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे होत्या. मात्र, चार दिवसांपासून नगरशहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ऊस पिकासह ५ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्र असून यात ऊस पिकाशिवाय २९ हजार ६५३ हेक्टरवर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही तालुक्यात पेरणीसाठी अद्याप वाफसा न झाल्याने त्या ठिकाणी पुढील आठवड्यात पेरण्याला सुरूवात होणार आहे. अकोले तालुक्यात अद्याप दमदार पाऊस नसल्याने भाताच्या लागवडी खोळंबल्या आहेत. (प्रतिनिधी)नगर तालुक्यात १ हजार ३२, कर्जत १२ हजार ४६६, जामखेड ८ हजार ७०९, पाथर्डी २ हजार १५६, श्रीगोंदा ९२७ हेक्टरवर पेरणया झालेल्या आहेत. १२ हजार १०९ हेक्टरवर तृणधान्य पीक असून याची पेरणी खरिपाच्या पेरणीत गृहीत धरण्यात येत नाही. जिल्ह्यात अवघ्या ११ हजार ७८७ हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे. हा सर्व खोडवा ऊस आहे. पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्टर) बाजरी ७ हजार १३६, मका ४ हजार ९७३, तूर १ हजार ९१७, मूग ३ हजार ३०९, उडीद ७ हजार ८८१, भूईमूग ४, सुर्यफूल ३२०, यासह चारा पिके ३ हजार ३६६, कांदा पिक १५, भाजीपाला पिके ११० यांचा समावेश आहे.