शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हगणदारीमुक्त गाव योजनेचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : शासनाने हगणदारीमुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्या. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने अंमलबजावणीदेखील केली. मात्र, परराज्यातील बांधकाम कामगार, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : शासनाने हगणदारीमुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्या. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने अंमलबजावणीदेखील केली. मात्र, परराज्यातील बांधकाम कामगार, मजूर हे उघड्यावर शौचास जात असल्याने संगमनेर शहर व परिरसरातील काही गावांमध्ये हगणदारीमुक्त गाव या योजनेचा फज्जा उडाला आहे.

उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यांमधून मोठ्या संख्येने बांधकाम कामगार, मजूर रोजंदारीसाठी संगमनेर तालुक्यात आले आहेत. अनेक जण आपल्या कुटुंबीयांसमवेत आले आहेत. संगमनेर तालुक्यात वर्षभर छोटी- मोठी बांधकामे सुरू असतात. बांधकामांसाठी परराज्यातील कामगार, मजुरांना मोठी मागणी असते.

सध्या शहर व परिसरातील काही गावांमध्ये अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ठेकेदार हा कामगार, मजुरांना पाणी, वीज या सुविधा उपलब्ध करून देतो. त्यामुळे हे लोक बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणीच कुटुंबीयांबरोबरच कोप्यांमध्ये अथवा पत्र्यांच्या शेडमध्ये राहतात. ठेकेदार केवळ त्यांची राहण्याची व्यवस्था करतो. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी शौचालयाची सोय नसल्याने पुरुष, महिला, मुले व मुली या सर्वांनाच उघड्यावर शौचाला जावे लागते, उघड्यावरच त्यांना अंघोळ करावी लागते. परिसरातील मोकळे प्लॉट अथवा नागरिकांच्या घराजवळ हे सर्व जण शौचास जातात. त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढताना दिसून येते आहे. याचा रहिवाशांना त्रास होत आहे.

शौचालयाची कोणतीही सोय नसल्याने बांधकामावर काम करणाऱ्या महिला, मुलींची कुचंबणा होते, तसेच हगणदारीमुक्त झालेल्या गावांमध्ये पुन्हा एकदा हगणदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हगणदारीमुक्तीसाठी केलेल्या सर्व उपाययोजना फोल ठरलेल्या दिसतात. मुक्त हगणदारीचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होतो, तसाच उड्यावर शौचास जाणाऱ्या बांधकामांवर काम करणाऱ्या महिला, मुलींच्या आरोग्यावरही होतो आहे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.

-----

मोबाइल टॉयलेट ठेवावेत

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मोबाइल टॉयलेट ठेवावेत; अथवा ठेकेदाराने त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचे शौचालय बांधून द्यावे. केवळ त्यांच्याकडून काम करून घेऊ नये, त्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

-------