शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतील अपयश: विखे- कर्डिलेंमध्ये कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:56 IST

अहमदनगर: आपआपल्या राजकीय पक्षांच्या भूमिका बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या २१ जागा बिनविरोध करण्यावर जिल्ह्यातील नेत्यांचे एकमत झाले होते. त्यासाठी ...

अहमदनगर: आपआपल्या राजकीय पक्षांच्या भूमिका बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या २१ जागा बिनविरोध करण्यावर जिल्ह्यातील नेत्यांचे एकमत झाले होते. त्यासाठी विखे- थोरात गटात समझोता करण्याचा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी प्रयत्नही केला. परंतु, त्यांचा प्रयत्न फसला आणि अखेर चार जागांसाठी निवडणूक लागली. याशिवाय भाजपला आपले उमेदवार बिनविरोध करण्यात फारसे यश आले नाही. जिल्हा बँकेतील हे अपयश भाजपाच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी मात्र जिल्हा बँकेबाबत कर्डिले यांचे नाव पुढे केले आहे. भाजपकडून कर्डिले यांच्यावरच जबाबदारी होती. तेच चर्चेसाठी जात होते, असे विधान विखे यांनी गुरुवारी नगरमध्ये केले. दरम्यान कर्डिले यांनीही, ‘हो जबाबदारी माझ्यावर होतीच, मी नाकारत नाही. थोरात व विखे यांच्यात समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या २१ जागा बिनविरोध करण्यास दोघांचीही मान्यता होती. मात्र सर्वांचेच समाधान करणे शक्य झाले नाही. चार जागांवर निवडणूक लागली’ अशी खंत कर्डिले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. यावरून जिल्हा बँकेतील भाजपाचे हे अपयश नेमके कुणाचे ? कर्डिलेंचे की विखेंचे, यावरून पुढील काही दिवस नगरकरांचे मनोरंजन होणार आहे.

...

जिल्हा बँकेची जबाबदारी कर्डिलेंवरच- विखे

जिल्हा बँक निवडणुकीबाबत खासदार डॉ. सुजय विखे यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता विखे म्हणाले, जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक पार पडू द्या, त्यानंतर याबाबत बोलेन, असे सांगतानाच भाजपकडून सर्व जबाबदारी कर्डिले यांच्यावर होती. काही जागांसाठी राजकीय तडजोडी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. ते चर्चेसाठी गेले होते. इतर सर्व मुद्यांबाबत निवडणूक निकालानंतर भूमिका मांडणार आहे. मला कुणाला घाबरायचे कारण नाही. निकालानंतर टीकाटिप्पणी होईल आणि तीही जाहीरपणे होईल, यात शंका नाही, असे विखे यांनी स्पष्ट केले.

.....

जबाबदारी नाकारत नाही- कर्डिले

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. बँकेत राजकारण करायचे नाही, या एका मुद्यावर सर्वांचे एकमत होते. त्यासाठी विखे- थोरात यांच्यात मध्यस्थी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी पार पाडली. सर्व जागा बिनविरोध करण्यासाठी महसूलमंत्री थोरात यांची भेट घेतली व बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला. त्यांनीही मान्यता दिली. पण, ही मान्यता देताना त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून सांगतो, असे सांगितले. तसा निरोप माजीमंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डाॅ. सुजय विखे यांना दिला होता. त्यांनीही मान्यता दिली होती. परंतु, सर्वांचे समाधान झाले नाही. त्यामुळे चार जागांसाठी निवडणूक लागली. स्थानिक राजकारणामुळे या चार जागांवर निवडणूक घ्यावी लागली. यामुळे बँकेचा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे, असेही कर्डिले म्हणाले.

...