शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पुणतांब्यातील दलित वस्तीत भीषण पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 13:00 IST

येथील दलित वस्तीमध्ये सिध्दार्थनगर, अण्णा भाऊ साठे नगर, राजवाडा, आठरावाडी, एकोणवीस वाडी असे विभागलेल्या आहेत.

पुणतांबा : येथील दलित वस्तीमध्ये सिध्दार्थनगर, अण्णा भाऊ साठे नगर, राजवाडा, आठरावाडी, एकोणवीस वाडी असे विभागलेल्या आहेत. या सर्व वस्तीत सरकारी योजनेचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे. पाणी टंचाई भीषण आहे. अनेक रोजगारांसाठी बाहेरगावी गेले आहे. पाण्यामुळे येथील नागरिक आमच्याकडे येऊ नका असे सांगत आहेत.आठरावाडी, एकोणवीस वाडी येथील बहुतेक हे शेती महामंडळाचे कायम कामगार तर उर्वरित हे रोजंदारीचे कामगार होते. पण शेती महामंडळ बंद झाल्याने बहुतेक कामगारांचे मराठवाड्यात स्थलांतर झाले. जे कामगार आहेत, त्यांना पाण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवर अवलंबून रहावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. रोजंदारी सोडून पाणी आणावे लागत आहे. पाण्याच्या कारणाने घरातील लहान मोठ्या माणसांना परगावी पाठविले आहेत. येणाºया पाहुण्यांना आमच्याकडे पाणी नाही, येऊ नका.. असे सांगावे लागत आहे. आठरावाडी येथील रस्त्याचे मुरुमीकरण झाले आहे. तर काही रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.जवळजवळ हीच परिस्थिती सिद्धार्थ नगर, अण्णा भाऊ साठे नगर, राजवाडा येथे आहे. इतर मूलभूत सुविधांपासून ह्या वस्त्या वंचित आहेत. सिध्दार्थ नगरमध्ये अर्धवट झालेला मुख्य रस्ता असला तरी त्याला जोडणारे उपरस्ते नाहीत. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पाणीच नाही. विहिरीत गाळ साचलेला आहे. कित्येक दिवसात पाण्याचा उपसा नाही. त्या योजनेचे पाईप गायब झालेले आहेत.आजमितीला पाणी नाही. हायमॅक्सचे दिवे नाहीत. सिद्धार्थ नगरमध्ये दलित वस्ती सुधार योजनेची अंमलबजावणी होत आली तरी ती कामे पूर्ण नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सिद्धार्थ नगरची दलित वस्ती म्हणून नोंद नाही.राजवाड्यामध्ये महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था दयनीय आहे. यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शौचालयाचे दरवाजे तुटलेली असून मैला साठवणाºया टाक्याच बांधल्या नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. महिलांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही. तर पाण्याच्या टाकीत पाणीच नाही. घरकूल योजनेतून बहुतेकांची घरे झालेली आहेत. घरात शौचालय बांधलेले आहे.पाण्याच्या कमतरतेमुळे उघड्यावर शौचालयाला जाणे भाग पडू लागलेले आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव फक्त कागदपत्रात गुंडाळून राहिल्याचे दिसून येत आहे.सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्ष लागवड झाली. झाडांना मनरेगा अंतर्गत पाणी दिले जाते. पण रोजंदारीसाठी ठराविक कुटुंबेच लाभ घेतात. अनेकांना मात्र रोजंदारीसाठी इतरत्र भटकावे लागत आहे.सिद्धार्थ नगरातील अंतर्गत रस्तेच नसल्याने जाण्या येण्यासाठी नेहमीच अडचण होत आहे. रुग्णाला नेण्यासाठी दारापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नाही. - बाळासाहेब चिमाजी थोरात, पुणतांबा.दुष्काळामुळे आज व्यापारावर परिणाम झाल्याने हमालीचे पण काम मिळेना. इतर कामासाठी पाणी नसल्याने गटारीला पाणी वाहत नाही. पाणी एकाच जागी गटारीत साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. -सुनील पगारे, पुणतांबा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता