शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

पुणतांब्यातील दलित वस्तीत भीषण पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 13:00 IST

येथील दलित वस्तीमध्ये सिध्दार्थनगर, अण्णा भाऊ साठे नगर, राजवाडा, आठरावाडी, एकोणवीस वाडी असे विभागलेल्या आहेत.

पुणतांबा : येथील दलित वस्तीमध्ये सिध्दार्थनगर, अण्णा भाऊ साठे नगर, राजवाडा, आठरावाडी, एकोणवीस वाडी असे विभागलेल्या आहेत. या सर्व वस्तीत सरकारी योजनेचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे. पाणी टंचाई भीषण आहे. अनेक रोजगारांसाठी बाहेरगावी गेले आहे. पाण्यामुळे येथील नागरिक आमच्याकडे येऊ नका असे सांगत आहेत.आठरावाडी, एकोणवीस वाडी येथील बहुतेक हे शेती महामंडळाचे कायम कामगार तर उर्वरित हे रोजंदारीचे कामगार होते. पण शेती महामंडळ बंद झाल्याने बहुतेक कामगारांचे मराठवाड्यात स्थलांतर झाले. जे कामगार आहेत, त्यांना पाण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवर अवलंबून रहावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. रोजंदारी सोडून पाणी आणावे लागत आहे. पाण्याच्या कारणाने घरातील लहान मोठ्या माणसांना परगावी पाठविले आहेत. येणाºया पाहुण्यांना आमच्याकडे पाणी नाही, येऊ नका.. असे सांगावे लागत आहे. आठरावाडी येथील रस्त्याचे मुरुमीकरण झाले आहे. तर काही रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.जवळजवळ हीच परिस्थिती सिद्धार्थ नगर, अण्णा भाऊ साठे नगर, राजवाडा येथे आहे. इतर मूलभूत सुविधांपासून ह्या वस्त्या वंचित आहेत. सिध्दार्थ नगरमध्ये अर्धवट झालेला मुख्य रस्ता असला तरी त्याला जोडणारे उपरस्ते नाहीत. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पाणीच नाही. विहिरीत गाळ साचलेला आहे. कित्येक दिवसात पाण्याचा उपसा नाही. त्या योजनेचे पाईप गायब झालेले आहेत.आजमितीला पाणी नाही. हायमॅक्सचे दिवे नाहीत. सिद्धार्थ नगरमध्ये दलित वस्ती सुधार योजनेची अंमलबजावणी होत आली तरी ती कामे पूर्ण नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सिद्धार्थ नगरची दलित वस्ती म्हणून नोंद नाही.राजवाड्यामध्ये महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था दयनीय आहे. यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शौचालयाचे दरवाजे तुटलेली असून मैला साठवणाºया टाक्याच बांधल्या नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. महिलांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही. तर पाण्याच्या टाकीत पाणीच नाही. घरकूल योजनेतून बहुतेकांची घरे झालेली आहेत. घरात शौचालय बांधलेले आहे.पाण्याच्या कमतरतेमुळे उघड्यावर शौचालयाला जाणे भाग पडू लागलेले आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव फक्त कागदपत्रात गुंडाळून राहिल्याचे दिसून येत आहे.सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्ष लागवड झाली. झाडांना मनरेगा अंतर्गत पाणी दिले जाते. पण रोजंदारीसाठी ठराविक कुटुंबेच लाभ घेतात. अनेकांना मात्र रोजंदारीसाठी इतरत्र भटकावे लागत आहे.सिद्धार्थ नगरातील अंतर्गत रस्तेच नसल्याने जाण्या येण्यासाठी नेहमीच अडचण होत आहे. रुग्णाला नेण्यासाठी दारापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नाही. - बाळासाहेब चिमाजी थोरात, पुणतांबा.दुष्काळामुळे आज व्यापारावर परिणाम झाल्याने हमालीचे पण काम मिळेना. इतर कामासाठी पाणी नसल्याने गटारीला पाणी वाहत नाही. पाणी एकाच जागी गटारीत साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. -सुनील पगारे, पुणतांबा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता