शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

तणनाशकावर उतारा काक-या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:03 IST

वारंवार तणनाशकाचा वापर करून जमिनीचा पोत बिघडत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. मात्र सडे (ता. राहुरी) येथील शेतकरी गुलाब सरोदे हे गेल्या तीन वर्षापासून कपाशी या पिकामध्ये काक-या हाकून तणाचा बंदोबस्त करीत आहेत.

भाऊसाहेब येवलेराहुरी : वारंवार तणनाशकाचा वापर करून जमिनीचा पोत बिघडत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. मात्र सडे (ता. राहुरी) येथील शेतकरी गुलाब सरोदे हे गेल्या तीन वर्षापासून कपाशी या पिकामध्ये काक-या हाकून तणाचा बंदोबस्त करीत आहेत. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली आहे. ग़ुलाब सरोदे यांची चार एकर जमीन आहे. दरवर्षी कपाशी, ऊस, भुईमूग अशी पिके घेतात. कपाशी या पिकावर कमी खर्च करण्याकडे त्यांचा कल आहे. कपाशीची दीड बाय चार या अंतरावर लागवड करण्यात आली आहे. कपाशी पीक उगवल्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे कपाशीमध्ये गवत व वेल उगवण्यास सुरूवात झाली आहे. त्यावर उतारा म्हणून गुलाब सरोदे यांनी काक-या मारण्यास सुरूवात केली आहे.सरोदे यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष भेट दिली असता ‘लोकमत’शी संवाद साधतांना सांगितले की, दोन एकर क्षेत्रावर भक्ती या वाणाची लागवड करण्यात आली आहे. कपाशी उगवल्यानंतर गवताचा बंदोबस्त करण्यासाठी काक-या मारल्या. त्यामुळे गवताचा बंदोबस्त होऊन जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत झाली. कपाशी लावणीपासून ते कापूस वेचण्यापर्यंत पंचवीस हजार रूपये खर्च होतो. तण नियंत्रणासाठी खुरपणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे होणारा खर्च व उत्पन्न यामध्ये मेळ बसत नाही. त्यामुळे भाडोत्री बैलाच्या सहाय्याने काक-या मारल्या जातात. एकरी आठशे रुपये इतका अल्प खर्च काक-याला येतो. त्यामुळे कपाशी पिकाचे नुकसान न होता खर्च कमी होऊन जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते.कपाशी या पिकामध्ये यानंतर फरट मारण्यात येणार आहे. बाजरी पिकामध्येही आपण कोळपणीचा अवलंब करतो. मात्र भुईमूग पिकांमध्ये खुरपणी करून घेतो. उसाचे पीक गेल्यानंतर पाचरट न जाळता ते जमिनीत कुजविले जाते. त्यामुळे जमिनीला खत मिळून पोत सुधारण्यास मदत होते, असे गुलाब सरोदे यांनी सांगितले. राज्यभर शेतकरी बोंडअळीमुळे त्रस्त असताना स्प्रिंकलरचा कपाशी पिकामध्ये वापर करण्यात आला. त्यामुळे पीक धुऊन निघाले. स्पिंकलरव्दारे पाणी मिळाल्याने कोणताही रोग, कीड व मावा आढळून आला नाही. स्प्रिंकलरवर दोन एकरासाठी २७ हजार रूपये खर्च आला़ त्याचा वापर कांदा, भुईमूग या कमी वाढणा-या पिकासाठी होतो. सगळे रोग किडी धुऊन जातात. त्यामुळे मागील वर्षी एकही औषधाची फवारणी केली नाही़, असे गुलाब सरोदे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी