शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

टंचाईच्या योजनांना महिनाभराची मुदतवाढ

By admin | Updated: July 5, 2014 00:29 IST

अहमदनगर: पाऊस लांबल्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली असून, टंचाईच्या विविध योजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात

अहमदनगर: पाऊस लांबल्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली असून, टंचाईच्या विविध योजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिली़उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली़ बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ त्यावेळी ते बोलत होते़ राज्यात कालपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे़ मात्र जून पूर्णपणे कोरडा गेल्याने जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली़ मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला़ त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत़ वास्तविक पाहता टंचाईच्या विविध योजना ३० जूनपर्यंतच कार्यान्वित असतात़ परंतु पाऊस न पडल्याने टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, टंचाईबाबतच्या इतर योजनांनाही मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मुदतवाढ देण्याच्या निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले़ राज्यातील सर्व धरणातील पाणी पातळी खालावली आहे़ त्यामुळे पाणी वाटपाचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत़ त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठी पाणी द्यायचे आहे़ टँकरची मागणी केल्यास तातडीने टँकर उपलब्ध करून दिले जातील़ टँकरचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले असून, पिण्याच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल़ नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे़ वेळप्रसंगी मजुरांना काम उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्यास ते घेतले जातील, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली़ (प्रतिनिधी) राहुरी विद्यापीठात कडवळ पाऊस न पडल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़ चाऱ्याची गरज लक्षात घेऊन राहुरी कृषी विद्यापीठात कडवळाची पेरणी करण्यात येणार असून, आवश्यक त्याठिकाणी ते पुरविले जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले़पाणी कपातीच्या सूचनाजिल्ह्यातील पाणी पातळी खालावली आहे़ त्यामुळे मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात जुलै अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे़ उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे़ खबरदारीच्या उपाय योजना म्हणून पाणी कपात करण्याची आवश्यकता आहे़ इतर जिल्ह्यात पाणी कपातीचे निर्णय घेण्यात आले असून, नगर जिल्ह्यात १० ते २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी दिल्या़थकीत पाणी योजनांना संजीवनीजिल्ह्यातील पाणी योजनांची वीज बिले थकलेली असल्याने पाणी योजना बंद आहेत़ प्रादेशिक पाणी योजनांची थकबाकी वसूल न करता चालू बिले वसूल करून पाणी योजना सुरू ठेवल्या जातील़ चालू बिले वसूल करून योजना सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ महावितरणालादेखील तसे आदेश निर्गमित केल्याचे त्यांनी सांगितले़डायरेक्ट कॉल करा़़़़एकमेकांना सहकार्य करा, टंचाईवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा, व्यवस्थित नियोजन करा, गरज भासल्यास पालकमंत्र्यांशी चर्चा करा आणि तिथे प्रश्न सुटले नाही तर थेट आमच्याशी संपर्क साधला तरी चालेल, असेही पवार म्हणाले़