शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

'समन्यायी' कायद्यातून ब्रिटिशकालीन धरणे वगळावी; श्रीरामपूर बाजार समितीच्या सभेत ठराव

By शिवाजी पवार | Updated: September 29, 2023 10:18 IST

शेतकरी संघटना, बाजार समितीची सर्वसाधारण सभा विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात काल पार पडली

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : समन्यायी पाणी वाटप कायद्यातून ब्रिटिशकालीन धरणांना वगळण्यात यावे, या मागणीचा ठराव श्रीरामपूर बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. या कायद्यामुळे नगर व नाशिक विरुद्ध मराठवाडा असा पाणी संघर्ष पेटलेला आहे.

बाजार समितीची सर्वसाधारण सभा विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात काल पार पडली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सभापती सुधीर नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, बाबासाहेब दिघे, नानासाहेब पवार आदी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे नगर व नाशिक जिल्ह्याला दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचा आरोप केला. समन्यायी कायद्यानुसार जायकवाडी धरणात पिण्यासाठी पर्याप्त साठा नसेल तर गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून पाणी सोडावे लागते.

ताके म्हणाले, समन्यायी पाणी वाटप कायदा हा ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाला लागू करू नये. हा कायदा संपूर्ण राज्यासाठी करण्यात आला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केवळ गोदावरी खोऱ्यातच केली जात आहे. भीमा खोऱ्यात समन्यायी कायद्याची अंमलबजावणी गरज असूनही अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यामुळे उजनीसाठी पाणी सोडले गेले नाही. समन्यायीचा कायदा केवळ नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गळा अवळण्यासाठी केलेला असावा, असे षडयंत्र वाटते.