शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव शहरात दर अर्ध्या तासाला बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST

शेवगाव : शहरात दररोज दर अर्ध्या तासाला वीज (बत्ती) गुल होत असून, सततच्या अशा प्रकाराने येथील विविध व्यावसायिकांसह नागरिकही ...

शेवगाव : शहरात दररोज दर अर्ध्या तासाला वीज (बत्ती) गुल होत असून, सततच्या अशा प्रकाराने येथील विविध व्यावसायिकांसह नागरिकही हैराण झाले आहेत. शहरात वीज खंडित होण्याची कोणतीच ठरावीक वेळ नसून रात्री, बेरात्री, तर दिवसा कधीही वीज खंडित होते. कधी पाच मिनिटे, कधी अर्धा तास, एक तास, तर कधी दोन तासही वीज गुल असते. महावितरणच्या अशा गलथान कारभाराविरोधात नागरिक, व्यावसायिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होणे, विद्युत दाब अचानक कमी- जास्त होणे यासारखे प्रकार नित्याचेच झाले आहेत. अलीकडच्या काही दिवसांपासून अगदी नियमितपणे वीजपुरवठा खंडित होतो. तो पुन्हा कधी सुरू होईल अन् खंडित होईल, याचा अंदाजही नसतो. अचानक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व विद्युत दाब अचानक कमी- जास्त होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणांत बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने पीठगिरणी बंद राहते.

वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे अनेकांचे टीव्ही, फ्रीज, कूलर, पंखा, एसी, झेराक्स मशीन, बोअरवेलचे मीटर, कॉम्युटरमध्ये बिघाड झाले आहेत. याचबरोबर छोटे- मोठे उद्योग, व्यवसाय, दुकाने, विविध शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, बँका, हॉस्पिटल आदी ठिकाणीही विजेच्या लपंडावाचा परिणाम होत आहे. यामुळे अनेक कामे खोळंबून राहत आहेत.

शहरातील बहुतांश नागरिक वेळेवर वीज बिलाचा भरणा करतात. बिल भरण्यास उशीर झाल्यास कंपनीचे वायरमन लगेचच वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देतात. मग, वीज गायब झाल्यानंतर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तोंड का लपवितात, असा सवालही नागरिक करत आहेत.

-----

वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे अनेकदा इन्व्हर्टर चार्ज होत नाही. परिणामी, ग्राहक माघारी जातात. आर्थिक नुकसान होते. ग्राहकांची कामे वेळेत करता येत नाहीत.

-रेवणनाथ नजन,

संचालक, साईश्रद्धा मल्टिसर्व्हिसेस, शेवगाव

----

अगोदरच कोरोनामुळे व्यवसाय संकटात आहे. त्यात वीज ये-जा करते. त्यामुळे आणखी नुकसान होत आहे. माझा बलून डेकोरेशनचा व्यवसाय आहे. वीज नसल्याने अनेक ऑर्डर ऐनवेळी रद्द कराव्या लागल्या आहेत. त्याचा आर्थिक फटका बसतो.

-महेश कुटे,

संचालक, अनुसई इव्हेंट

----

शहरातील अतिक्रमणामुळे वेगळ्या लाइन टाकता येत नाहीत. पूर्वी दोनच फिडर होते, ते आता सहा केले आहेत. काही ठिकाणी नव्याने फिडर, विजेचे खांब बसविणे गरजेचे आहे. मात्र, जागेचा अभाव आहे. लाइन कॉम्पोझिट आहेत. त्यामुळे पावसाळ्यात काम करताना अडचणी येत आहेत. सात कोटी रुपयांचा आराखडा बनवून प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

-सुशील तायडे,

सहअभियंता, महावितरण