शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

साठेआठ कोटींचा निधी तरी रखडला रस्ता; नागरिकांचा महापालिकेत ठिय्या

By अरुण वाघमोडे | Updated: May 3, 2023 14:07 IST

प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

अरुण वाघमोडे, अहमदनगर: साठेआठ कोटी रुपयांचा निधी दोन वर्षांपासून मंजूर असतानाही केवळ अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे शहरातील सर्वांधिक वर्दळीचा समजला जाणारा काटवन खंडोबा रस्त्याचे काम रखडल्याने संतप्त नागरिकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. ८ मे रोजी कामाची निविदा उघडली जाणार असून त्यानंतर सात दिवसांत ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येतील, असे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात के.डी खानदेशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे शिवाजीराव ससे, अशोकराव आगरकर, श्रीधर नांगरे, नानासाहेब दळवी, तसेच जागरूक नागरिक मंचाचे सचिव कैलास दळवी, सुनील कुलकर्णी, बाळासाहेब कुलकर्णी, जय कुमार मुनोत, प्रकाश शिंदे, श्यामा साठे, योगेश गंणगले, छावा संघटनेच्या सुरेखा सांगळे, हर्षल व्यवहारे, ओंकार व्यवहारे, परेश व्यवहारे आदी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मुळे म्हणाले काटवन खंडोबा हा नगरमधील सर्वात महत्त्वाचा शॉर्टकट रस्ता रस्ता आहे. येथून तीन मिनिटांमध्ये रेल्वे स्टेशन व दिल्ली गेटला जाता येते. मात्र स्वतंत्र्यानंतर या रस्त्याचे भाग्य उजाळले नाही. या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. आंदोलकांशी उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे यांनी चर्चा करत लेखी आश्वासन दिले. रस्त्याचे काम सुरू झाले नाही बेमुदत उपोषण करण्याचा ईशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर