शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

दहावीच्या निकालाआधीच तंत्रनिकेतनचे प्रवेश सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:44 IST

दहावीचा निकाल अजून जाहीर झालेला नसतानाही राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतनची (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

विनोद गोळेपारनेर : दहावीचा निकाल अजून जाहीर झालेला नसतानाही राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतनची (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच तंत्रनिकेतनसाठी अर्ज भरावे लागणार आहेत. यातून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्र शिक्षण शाखेकडे जाण्याचा कल वाढून तंत्रनिकेतन महाविद्यालयांनाही संजीवनी मिळणार आहे़राज्यात दहावीनंतर पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञान, मेकॅनिकल, अ‍ॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशनसह इतर विभागांचा समावेश असतो़ अकरावी, बारावीनंतर अभियांत्रिकीला जाण्याऐवजी दहावीनंतरच तीन वर्षे तंत्रशिक्षण घेण्याच्या या पॅटर्नकडे दरवर्षीच्या उशिरा प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थीसंख्या काही प्रमाणात रोडावली होती़ यामुळे राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालये अडचणीत आली होती.गुणपत्रिका थेट तंत्र शिक्षण विभाग घेणारदहावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाआधीच तंत्रनिकेतन महाविद्यालयात ३० मे ते १८ जून दरम्यान आॅनलाईन नोंदणी करायची आहे़ यात विद्यार्थी कोणत्या तालुक्यातील, कोणत्या शाळेतून दहावीत शिक्षण घेतले?, ही माहिती तंत्र शिक्षण विभागाकडे राहणार आहे़ विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल लागल्यावर तंत्र शिक्षण विभाग थेट संबंधित विद्यार्थ्याचा निकाल महाराष्ट राज्य परीक्षा मंडळाकडून घेऊन लगेच तंत्रनिकेतन महाविद्यालयांची गुणवत्ता यादी तयार करण्याची नवी पद्धत राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ़ अभय वाघ यांच्या संकल्पनेतून साकारली जाणार आहे़राज्यात दरवर्षी २६ जूननंतर तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरू होते़ मात्र त्यात विद्यार्थी व संस्थांचे मोठे नुकसान होत होते़ त्यामुळे आम्ही यावर्षीपासून तंत्रशिक्षणाची प्रकिया महिनाभर आधीच सुरू केली आहे. तीस मे ते अठरा जूनपर्यंत नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे सुरू करावी़ यात विद्यार्थ्यांची शाळेची व इतर माहिती घेतली जाणार आहे़ यातून विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे़ लगेच निकालपत्रक देण्याची गरज नाही़ - डॉ़अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई.दहावीच्या निकालानंतर धावपळ होण्यापेक्षा आधीच विद्यार्थ्यांची गुणपत्रिकेशिवाय सुरू केलेली तंत्रनिकेतनची प्रवेशप्रक्रिया चांगली आहे़ -योगिता फापाळे, विद्यार्थिनी, तंत्रशिक्षण विद्यालय, अवसरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा