शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

अनलॉक झाले तरी पॅसेंजर रेल्वे बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सर्वत्र अनलॉक झाले असून, सर्वत्र व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र असे असले तरी ...

श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सर्वत्र अनलॉक झाले असून, सर्वत्र व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र असे असले तरी दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या अद्यापही बंद आहेत. अत्यंत महत्त्वाच्या मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर गाडीलाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

नगर जिल्ह्याच्यादृष्टीने दौंड-मनमाड हा रेल्वेमार्ग जिव्हाळ्याचा विषय आहे. याच मार्गाने नगरला दक्षिण व उत्तर भारताशी जोडलेले आहे. भाविक, लष्करातील जवान, विद्यार्थी वर्गाच्यादृष्टीने रेल्वे गाड्यांना विशेष महत्त्व आहे. शिर्डीतील साईनगर रेल्वे स्थानकावर देशातील अनेक शहरातून रेल्वे गाड्या दाखल होतात. लांब पल्ल्याच्या वरील सर्व एक्स्प्रेस गाड्या सध्या सुरू आहेत. मात्र पॅसेंजर गाड्यांना प्रशासनाने अद्यापही हिरवा झेंडा दाखविलेला नाही. एक वर्ष होऊनही या गाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या कायमच्याच बंद केल्याचा संशयही प्रवासी व्यक्त करत आहेत.

--------

जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे

दरभंगा-पुणे

वाराणसी-ज्ञानगंगा

नागपूर-पुणे गरीब रथ

नागपूर-पुणे एक्स्प्रेस

झेलम-एक्स्प्रेस

गोवा-एक्स्प्रेस

कर्नाटक-एक्स्प्रेस

शिर्डी फास्ट पॅसेंजर

महाराष्ट्र एक्स्प्रेस

पाटणा-पुणे

हावडा एक्स्प्रेस

------

सर्वाधिक वेटिंग

झेलम एक्स्प्रेस व कर्नाटक एक्स्प्रेसला सर्वाधिक वेटिंग असते. पुणे-पाटणा या गाडीलाही प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे गाडी सुटण्यापूर्वी १२० दिवस आधी बुकिंग सुरू होते. सर्व आरक्षित सीट फुल्ल होतात.

----------

एसीचेही वेटिंग

लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचे एसीचे आरक्षण सध्या मिळत नाही. उन्हाची तीव्रता अद्यापही कायम आहे. त्यामुळे प्रवासी एसीला प्राधान्य देत आहेत.

-----

पॅसेंजर कधी सुरू होणार?

शिर्डीहून सुटणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या दोन्ही पॅसेंजर गाड्या सध्या बंद आहेत. त्यामुळे श्रीरामपूर, कोपरगाव, तसेच नगर येथील व्यापारी वर्गाचे हाल होत आहेत. कपडे, स्टेशनरी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स तसेच इतर मालाची खरेदी ही मुंबईतून केली जाते. त्याचबरोबर पुणे-मनमाड, नांदेड-पुणे, निजामाबाद या गरिबांना परवडणाऱ्या गाड्याही सुरू झालेल्या नाहीत.

---------

केंद्र सरकारला पॅसेंजर गाड्या चालविण्यात रस नाही असे दिसते. त्यांना केवळ नफ्यातील गाड्या हव्या आहेत. मात्र रेल्वे हा सेवा उद्योग आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली पॅसेंजर गाड्या कायमस्वरूपी बंद केल्या जातील, अशी शक्यता आहे.

- रणजित श्रीगोड, ज्येष्ठ नेते, प्रवासी संघटना

------