शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
3
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
4
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
5
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
6
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
7
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
8
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
9
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
10
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
11
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
12
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
13
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
14
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
15
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
16
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
17
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
18
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
19
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
20
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग

तेरा शेतकरी कंपन्यांची स्थापना

By admin | Updated: October 30, 2023 11:04 IST

अहमदनगर : राज्य सरकारच्या आत्मा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १३ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली

अहमदनगर : राज्य सरकारच्या आत्मा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १३ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून, या कंपन्यांना जागतिक बँकेच्या एम़ए़एस़पी़ प्रकल्पातून सुमारे ९७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले व उपसंचालक संभाजी गायकवाड यांनी दिली़जिल्ह्यात १४ शेतकरी कंपन्यांची स्थापना करावयाची होती़ त्यापैकी पाच कंपन्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित आठ कंपन्या स्थापन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे़ या कंपन्यांच्या माध्यमातून विविध शेतमालावर प्रक्रिया आणि उत्पादन करण्यात येणार आहे़ शेतकरी कंपनीमार्फत उत्पादित माल राज्यासह परराज्यात आणि देशाबाहेरही एक्स्पोर्ट करण्यावर प्राधान्य राहणार आहे़ शेतकरी कंपनीसाठी आत्माअंतर्गत शेतकरी गट स्थापन करण्यात आले होते़ या शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहे़ त्यासाठी जागतिक बँकेकडून एका कंपनीस साडेसात लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत असून, उर्वरित भागभांडवल शेतकऱ्यांना उभे करायचे आहे़ कंपनी स्थापनेमुळे शेतीमालावर थेट प्रक्रिया करणे आणि विक्री करणे सुलभ होणार आहे़(प्रतिनिधी)राहात्यात पहिली महिला कंपनीराहाता परिसरात महिलांची शेतकरी कंपनी स्थापन करण्यात येत आहे़ या कंपनीच्या क्षमताबांधणीचे काम पूर्णत्वाकडे असून, महिलांची ही कंपनी राज्यातील पहिली महिला शेतकरी कंपनी ठरणार आहे़ त्यामुळे महिलाही प्रक्रिया आणि उत्पादक होणार असून, कंपनीच्या मालक होणार आहेत़या आहेत १३ कंपन्याराहाता ग्रामोद्योग (राहाता), अमरसिंह (कर्जत), फार्मसीस (पारनेर), दत्तकृपा (शेवगाव), गर्भगिरी (वांबोरी, ता़ राहुरी) या पाच कंपन्यांची नोंदणी कंपनीअ‍ॅक्ट कायद्यानुसार पूर्ण झाली आहे़ तर आदर्श उत्पादक कंपनी (पिंप्री लौकी), माऊली शेतकरी उत्पादक संघ (श्रीगोंदा), ज्ञानदीप उत्पादक संघ (कुकाणा), पुण्यस्तंभ उत्पादक संघ (पुणतांबा), जाणता राजा उत्पादक संघ (टाकळीभान), आदर्श साई माऊली उत्पादक संघ (दहिगाव बोलका), साकुर पठार उत्पादक संघ (साकुर), साई प्रवरा उत्पादक संघ (कोल्हार) या आठ उत्पादक शेतकरी कंपन्याची नोंदणी अंतिम टप्प्यात आहे़ ‘गर्भगिरी’ची भरारीवांबोरी येथील गर्भगिरी शेतकरी उत्पादक कंपनीने अन्नधान्य व बीजप्रक्रिया प्रकल्पाची उभारणी सुरु केली आहे़ या प्रकल्पासाठी २२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, मशिनरीसाठी ७ लाख व युनिट बांधकामासाठी १५ लाख खर्च अपेक्षित आहे़ या कंपनीची खरीप हंगामात २१ लाख ६० हजारांची उलाढाल झाली असून, सुमारे ६ कोटी रुपयांचा कांदा उत्पादीत करणार आहे़ गंगाधर चिंधे यांनी कंपनीसाठी जमीन दिली आहे़