शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

तेरा शेतकरी कंपन्यांची स्थापना

By admin | Updated: October 30, 2023 11:04 IST

अहमदनगर : राज्य सरकारच्या आत्मा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १३ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली

अहमदनगर : राज्य सरकारच्या आत्मा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १३ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून, या कंपन्यांना जागतिक बँकेच्या एम़ए़एस़पी़ प्रकल्पातून सुमारे ९७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले व उपसंचालक संभाजी गायकवाड यांनी दिली़जिल्ह्यात १४ शेतकरी कंपन्यांची स्थापना करावयाची होती़ त्यापैकी पाच कंपन्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित आठ कंपन्या स्थापन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे़ या कंपन्यांच्या माध्यमातून विविध शेतमालावर प्रक्रिया आणि उत्पादन करण्यात येणार आहे़ शेतकरी कंपनीमार्फत उत्पादित माल राज्यासह परराज्यात आणि देशाबाहेरही एक्स्पोर्ट करण्यावर प्राधान्य राहणार आहे़ शेतकरी कंपनीसाठी आत्माअंतर्गत शेतकरी गट स्थापन करण्यात आले होते़ या शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहे़ त्यासाठी जागतिक बँकेकडून एका कंपनीस साडेसात लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत असून, उर्वरित भागभांडवल शेतकऱ्यांना उभे करायचे आहे़ कंपनी स्थापनेमुळे शेतीमालावर थेट प्रक्रिया करणे आणि विक्री करणे सुलभ होणार आहे़(प्रतिनिधी)राहात्यात पहिली महिला कंपनीराहाता परिसरात महिलांची शेतकरी कंपनी स्थापन करण्यात येत आहे़ या कंपनीच्या क्षमताबांधणीचे काम पूर्णत्वाकडे असून, महिलांची ही कंपनी राज्यातील पहिली महिला शेतकरी कंपनी ठरणार आहे़ त्यामुळे महिलाही प्रक्रिया आणि उत्पादक होणार असून, कंपनीच्या मालक होणार आहेत़या आहेत १३ कंपन्याराहाता ग्रामोद्योग (राहाता), अमरसिंह (कर्जत), फार्मसीस (पारनेर), दत्तकृपा (शेवगाव), गर्भगिरी (वांबोरी, ता़ राहुरी) या पाच कंपन्यांची नोंदणी कंपनीअ‍ॅक्ट कायद्यानुसार पूर्ण झाली आहे़ तर आदर्श उत्पादक कंपनी (पिंप्री लौकी), माऊली शेतकरी उत्पादक संघ (श्रीगोंदा), ज्ञानदीप उत्पादक संघ (कुकाणा), पुण्यस्तंभ उत्पादक संघ (पुणतांबा), जाणता राजा उत्पादक संघ (टाकळीभान), आदर्श साई माऊली उत्पादक संघ (दहिगाव बोलका), साकुर पठार उत्पादक संघ (साकुर), साई प्रवरा उत्पादक संघ (कोल्हार) या आठ उत्पादक शेतकरी कंपन्याची नोंदणी अंतिम टप्प्यात आहे़ ‘गर्भगिरी’ची भरारीवांबोरी येथील गर्भगिरी शेतकरी उत्पादक कंपनीने अन्नधान्य व बीजप्रक्रिया प्रकल्पाची उभारणी सुरु केली आहे़ या प्रकल्पासाठी २२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, मशिनरीसाठी ७ लाख व युनिट बांधकामासाठी १५ लाख खर्च अपेक्षित आहे़ या कंपनीची खरीप हंगामात २१ लाख ६० हजारांची उलाढाल झाली असून, सुमारे ६ कोटी रुपयांचा कांदा उत्पादीत करणार आहे़ गंगाधर चिंधे यांनी कंपनीसाठी जमीन दिली आहे़