शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

तेरा शेतकरी कंपन्यांची स्थापना

By admin | Updated: October 30, 2023 11:04 IST

अहमदनगर : राज्य सरकारच्या आत्मा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १३ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली

अहमदनगर : राज्य सरकारच्या आत्मा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १३ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून, या कंपन्यांना जागतिक बँकेच्या एम़ए़एस़पी़ प्रकल्पातून सुमारे ९७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले व उपसंचालक संभाजी गायकवाड यांनी दिली़जिल्ह्यात १४ शेतकरी कंपन्यांची स्थापना करावयाची होती़ त्यापैकी पाच कंपन्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित आठ कंपन्या स्थापन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे़ या कंपन्यांच्या माध्यमातून विविध शेतमालावर प्रक्रिया आणि उत्पादन करण्यात येणार आहे़ शेतकरी कंपनीमार्फत उत्पादित माल राज्यासह परराज्यात आणि देशाबाहेरही एक्स्पोर्ट करण्यावर प्राधान्य राहणार आहे़ शेतकरी कंपनीसाठी आत्माअंतर्गत शेतकरी गट स्थापन करण्यात आले होते़ या शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहे़ त्यासाठी जागतिक बँकेकडून एका कंपनीस साडेसात लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत असून, उर्वरित भागभांडवल शेतकऱ्यांना उभे करायचे आहे़ कंपनी स्थापनेमुळे शेतीमालावर थेट प्रक्रिया करणे आणि विक्री करणे सुलभ होणार आहे़(प्रतिनिधी)राहात्यात पहिली महिला कंपनीराहाता परिसरात महिलांची शेतकरी कंपनी स्थापन करण्यात येत आहे़ या कंपनीच्या क्षमताबांधणीचे काम पूर्णत्वाकडे असून, महिलांची ही कंपनी राज्यातील पहिली महिला शेतकरी कंपनी ठरणार आहे़ त्यामुळे महिलाही प्रक्रिया आणि उत्पादक होणार असून, कंपनीच्या मालक होणार आहेत़या आहेत १३ कंपन्याराहाता ग्रामोद्योग (राहाता), अमरसिंह (कर्जत), फार्मसीस (पारनेर), दत्तकृपा (शेवगाव), गर्भगिरी (वांबोरी, ता़ राहुरी) या पाच कंपन्यांची नोंदणी कंपनीअ‍ॅक्ट कायद्यानुसार पूर्ण झाली आहे़ तर आदर्श उत्पादक कंपनी (पिंप्री लौकी), माऊली शेतकरी उत्पादक संघ (श्रीगोंदा), ज्ञानदीप उत्पादक संघ (कुकाणा), पुण्यस्तंभ उत्पादक संघ (पुणतांबा), जाणता राजा उत्पादक संघ (टाकळीभान), आदर्श साई माऊली उत्पादक संघ (दहिगाव बोलका), साकुर पठार उत्पादक संघ (साकुर), साई प्रवरा उत्पादक संघ (कोल्हार) या आठ उत्पादक शेतकरी कंपन्याची नोंदणी अंतिम टप्प्यात आहे़ ‘गर्भगिरी’ची भरारीवांबोरी येथील गर्भगिरी शेतकरी उत्पादक कंपनीने अन्नधान्य व बीजप्रक्रिया प्रकल्पाची उभारणी सुरु केली आहे़ या प्रकल्पासाठी २२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, मशिनरीसाठी ७ लाख व युनिट बांधकामासाठी १५ लाख खर्च अपेक्षित आहे़ या कंपनीची खरीप हंगामात २१ लाख ६० हजारांची उलाढाल झाली असून, सुमारे ६ कोटी रुपयांचा कांदा उत्पादीत करणार आहे़ गंगाधर चिंधे यांनी कंपनीसाठी जमीन दिली आहे़