शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर उच्चाधिकार समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:27 IST

पारनेर : स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देण्यात यावी, या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा ...

पारनेर : स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देण्यात यावी, या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या समितीचे प्रारूप शुक्रवारी ठरणार असल्याचेही महाजन यांनी अण्णांना सांगितले.

तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून शुक्रवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारचे पत्र घेऊन राळेगणसिद्धीत येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्या बरोबर तासभर चर्चा करून सरकार बरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली.

बुधवारी केंद्रीय कृषिमंत्री तोमर व राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांची नवी दिल्ली येथे बैठक झाली.

स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, दूध, फळे, भाजीपाला यांनाही हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगप्रमाणे स्वायत्तता मिळावी या हजारे यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी केंद्रीय कृषी राज्य मंत्री तोमर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे महाजन यांनी अण्णांनी सांगितले. या समितीचे प्रारूप शुक्रवारी ठरविण्यात येणार आहे. अण्णांच्या मागणीनुसार या समितीत सरकारचे तीन व सिव्हिल सोसायटीचे तीन प्रतिनिधी असणार आहेत. समितीतील सरकारचे सदस्य कोण असतील व अशासकीय सदस्य कोण असतील याचा निर्णयही शुक्रवारी होणार असल्याचे सांगण्यात आले. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे लेखी पत्र घेऊन कृषिमंत्री व फडणवीस हजारे यांच्या भेटीला येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

...................

हजारे उपोषणावर ठाम

गुरुवारी भाजप नेते महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन उपोषणापासून परावृत्त होण्याची विनंती केली. तसेच अण्णांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही सांगितले. मात्र, या मागण्या जुन्याच आहेत. वारंवार लेखी देऊनही सरकारने त्यावर काहीच कार्यवाही न केल्याची खंत व्यक्त करीत हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात उपोषण करणार असल्याचे सांगितले.