शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर उच्चाधिकार समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:27 IST

पारनेर : स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देण्यात यावी, या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा ...

पारनेर : स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देण्यात यावी, या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने उच्चाधिकार समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या समितीचे प्रारूप शुक्रवारी ठरणार असून, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी आज अण्णांच्या भेटीला येत आहेत.

तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारे यांनी ३० जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, शुक्रवारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारचे पत्र घेऊन राळेगणसिद्धीत येणार आहेत. दरम्यान गुरुवारी सकाळी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी हजारे यांच्याबरोबर तासभर चर्चा करून सरकारबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली.

बुधवारी केंद्रीय कृषिमंत्री तोमर व राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांची नवी दिल्ली येथे बैठक झाली. स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, दूध, फळे, भाजीपाला यांनाही हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगप्रमाणे स्वायत्तता मिळावी या हजारे यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री तोमर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे महाजन यांनी अण्णांनी सांगितले. या समितीचे प्रारूप शुक्रवारी ठरविण्यात येणार आहे. अण्णांच्या मागणीनुसार या समितीत सरकारचे तीन व सिव्हिल सोसायटीचे तीन प्रतिनिधी असणार आहेत. समितीतील सरकारचे सदस्य कोण असतील व अशासकीय सदस्य कोण असतील याचा निर्णयही शुक्रवारी होणार असल्याचे सांगण्यात आले.

...................

हजारे उपोषणावर ठाम

गुरुवारी भाजप नेते महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन उपोषणापासून परावृत्त होण्याची विनंती केली. तसेच अण्णांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही सांगितले. मात्र, या मागण्या जुन्याच आहेत. वारंवार लेखी देऊनही सरकारने त्यावर काहीच कार्यवाही न केल्याची खंत व्यक्त करीत हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात उपोषण करणार असल्याचे सांगितले.