शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

साईसंस्थान प्रसादालयात अन्नपूर्णा देवीची स्थापना संस्थानच्या अन्नछत्रातील अनेक वर्षांची उणीव दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST

अन्नदान हे साईबाबांच्या शिकवणुकीतील मुख्य अंग आहे़ संस्थानकडून हा वारसा पुढे चालवला जात आहे़ सात एकर क्षेत्रात ...

अन्नदान हे साईबाबांच्या शिकवणुकीतील मुख्य अंग आहे़ संस्थानकडून हा वारसा पुढे चालवला जात आहे़ सात एकर क्षेत्रात उभारलेल्या संस्थान प्रसादालयात रोज हजारो भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात़ दोन वर्षांपूर्वीच्या रामनवमीत एका दिवसात प्रसाद घेणाऱ्या भाविकांच्या संख्येने नव्वद हजारांचा आकडा ओलांडला़ कोविड रुग्णांसाठी तर सध्या हे प्रसादालय वरदान ठरत आहे.

शतकोत्तरी परंपरा असलेल्या संस्थानच्या या भोजन प्रसाद व्यवस्थेत अन्नपूर्णा देवीचे अधिष्ठान असावे, प्रसादालयात या मूर्तीची स्थापना करावी अशी अनेक भाविकांची इच्छा होती़ संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी प्रसादालयातील ही उणीव दूर केली आहे़ अक्षय तृतीयेच्या दिवशी सीईओ कान्हुराज बगाटे व संगीता बगाटे यांच्या हस्ते प्रसादालयात अन्नपूर्णा देवीच्या संगमरवरी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली़

संस्थानचे डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, साई प्रसादालय विभाग प्रमुख विष्णू थोरात, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी बाळासाहेब जोशी, दिलीप सुलाखे आदींच्या उपस्थितीत हा विधी करण्यात आला़