शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
रशियानं बदला घेतला, युक्रेन जबरदस्त हादरला! ४०० हून अधिक ड्रोन अन् ४० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर, झेलेन्स्की संतापले
3
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
4
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
5
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
6
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
7
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
8
तिसऱ्या मुलासाठी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
9
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
10
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
11
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
12
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
13
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
14
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
15
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
16
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
17
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
18
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

नवीन शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून २०२० मध्येच संपली होती. मात्र, कोरोना ...

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून २०२० मध्येच संपली होती. मात्र, कोरोना संकटात शाळा कधी सुरू होतील हे नक्की नव्हते. यामुळे राज्य शासनाने या समित्यांच्या नव्याने निवडी न करता, शाळा सुरू होईपर्यंत आहे त्या समित्यांनाच मुदतवाढ दिली होती. मात्र, आता या समित्यांना दिलेली मुदतवाढ संपवून नवीन शाळा व्यवस्थापन समित्या तत्काळ स्थापन कराव्यात, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

लहान बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण अधिनियम २००९ नुसार मिळणारे शिक्षण आनंददायी असावे. यातून सर्वगुणसंपन्न पिढी तयार व्हावी, हे प्राथमिक शिक्षणाचे मूलभूत ध्येय आहे. हे साध्य होण्यासाठी पालक-शिक्षक आणि प्रशासनात शाळा व्यवस्थापन समिती महत्त्त्वाचा दुवा म्हणून कार्य करते. ज्या शाळा व्यवस्थापन समितीचा कारभार उत्कृष्ट राहतो त्या शाळेला भौतिक सुविधा, लोकसहभाग लाभतो. शिक्षक-पालकांत समन्वय राहतो. त्यामुळे शाळेचा गुणात्मक आलेख उंचावला जातो. म्हणून शाळा व्यवस्थापन समित्यांना विशेष महत्त्व आहेच. २ वर्षे मुदतीसाठी स्थापन होणाऱ्या या समितीत शाळेतील मुलांच्या पालकांची निवड केली जाते. शेवगावातील बऱ्याचशा शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून २०२० रोजीच संपली होती. मात्र, कोरोना पार्श्वभूमीवर या समित्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. राहिलेल्या शाळांच्या समित्यांची मुदतही जून २०२१ रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्यांच्या नव्याने निवडी करण्यात याव्यात, अशी मागणी भावीनिमगावचे सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, गोविंद मुंगसे, माधव काळे, रामकृष्ण मुंगसे आदींसह पालकांनी केली आहे.

----

कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता ऑगस्ट २०२० मध्ये मुदत संपलेल्या शाळा व्यवस्थापन समिती निवडीच्या कार्यक्रमाला राज्य शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये मुदतवाढ दिलेली होती. नवीन समित्यांच्या निवडीचे आदेश अद्याप प्राप्त नाहीत. आदेश येताच त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.

-रामनाथ कराड,

गटशिक्षणाधिकारी, शेवगाव

----

शाळेसंबंधी अनेक प्रश्न हे गावपातळीवरील असतात. ते सोडवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य नेहमीच अधोरेखित झाले आहे. लोकसहभागातून शाळा मूलभूत, भौतिक सुविधेने संपन्न होण्यासाठी समितीने प्रयत्नशील असावे, अशी पालकांना अपेक्षा असते. मात्र, अलीकडील काळात शाळांच्या व्यवस्थापन समित्या राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा विषय बनत आहेत.

-रामकृष्ण मुंगसे,

पालक, भावीनिमगाव