शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन मुलींचे साताऱ्याला पलायन; पोलिसांनी एकाच दिवसात घेतला शोध

By शिवाजी पवार | Updated: August 3, 2023 15:18 IST

श्रीरामपुरातून बेपत्ता, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांना तपासाचे आदेश दिले

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील खंडाळा येथील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुलींना शोधण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. दोघी मुली खंडाळा (जि.सातारा) येथे मिळून आल्या. त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मंगळवारी (दि. १) सकाळी नऊ वाजता दोन्ही अल्पवयीन मुली सायकलवर शाळेत गेल्या होत्या. मात्र संध्याकाळी साडे पाच वाजता शाळा सुटल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी शाळेत तसेच मैत्रिणींकडे चौकशी केली असता त्या कुठेही मिळून आल्या नाहीत. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या पालकांनी मुलींना फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली होती.

पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांना तपासाचे आदेश दिले. दोन्ही मुली पुणे बसने गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पुणे बसस्थानकातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. त्यात मुली सातारा बसने गेल्याचे दिसून आले. बसच्या चालक व वाहकाकडे विचारणा केल्यानंतर खंडाळा येथे मुली उतरल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शहर पोलिसांना खंडाळा येथे दोन्ही मुली मिळून आल्या. त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांना गावी आणण्यात आले. पोलिस अधिक तपास करत आहेत.