शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

राळेगण म्हसोबा येथील २८ एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 18:59 IST

राळेगण म्हसोबा गावातील सरकारी जमिनीवरील वृक्षांची तोड करुन अतिक्रमण करण्यात आले आहे. या तक्रारीला वर्ष उलटले तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला व वृक्षतोडीला प्रांताधिका-यांचेच अभय असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

अहमदनगर : नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा गावातील सरकारी जमिनीवरील वृक्षांची तोड करुन अतिक्रमण करण्यात आले आहे. याप्रकरणी हनुमंत बजाबा कचरे व संजय गणपत पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रांताधिकारी यांच्याकडे आॅक्टोबर २०१६ मध्ये तक्रार केली होती. या तक्रारीला वर्ष उलटले तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला व वृक्षतोडीला प्रांताधिका-यांचेच अभय असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.राळेगण म्हसोबा गावातील आडवामाळ येथील गट नं. १४० व गट नं. २७७ या सरकारी गायरान हद्दीतील जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाने २००५-२००६ मध्ये वृक्षलागवड केली होती. मात्र ही चांगल्या स्थितीतील आणि मोठी झालेली झाडे यंत्राच्या साहाय्याने काढून टाकण्यात आली. या जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले तसेच या जमिनीत बोअरवेलही घेण्यात आला. या सरकारी जमिनीवर संबंधिताने इंदिरा आवास योजनेतून २०१५- १६ साली घरकूल बांधले आहे. या गटाच्या जवळच गुणवडी तलाव असल्याने पाण्याची अवैध पाइपलाइन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. याच परिसरातील अनेक लोक या गायरानावर शेळ््या, मेंढ्या व गावरान जनावरे चारण्यास आणतात. मात्र या अतिक्रमणामुळे त्यांनाही अटकाव करण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाºयावर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या गटातील जमिनीची मोजणी करुन पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पुन्हा वृक्षलागवड करुन सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन करण्यात यावे. या मागणीची दखल न घेतल्यास शेळ््या-मेंढ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

अतिक्रमणप्रकरणी गावातील ६५ लोकांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. यानंतर तत्कालीन सर्कल वाघ व कामगार तलाठी यांनी पाहणी करुन तहसीलदारांनी अहवाल पाठविला आहे. त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

सर्वच झाडे जळाली कशी?या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून अधिकाºयांची दिशाभूल केली जात आहे. खोटी माहिती दिली जात आहे. या गटातील सर्वच झाडे दुष्काळामुळे कशी जळू शकतात. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी.- संजय पवार, तक्रारदार

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरforest departmentवनविभाग