शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राळेगण म्हसोबा येथील २८ एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 18:59 IST

राळेगण म्हसोबा गावातील सरकारी जमिनीवरील वृक्षांची तोड करुन अतिक्रमण करण्यात आले आहे. या तक्रारीला वर्ष उलटले तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला व वृक्षतोडीला प्रांताधिका-यांचेच अभय असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

अहमदनगर : नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा गावातील सरकारी जमिनीवरील वृक्षांची तोड करुन अतिक्रमण करण्यात आले आहे. याप्रकरणी हनुमंत बजाबा कचरे व संजय गणपत पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रांताधिकारी यांच्याकडे आॅक्टोबर २०१६ मध्ये तक्रार केली होती. या तक्रारीला वर्ष उलटले तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला व वृक्षतोडीला प्रांताधिका-यांचेच अभय असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.राळेगण म्हसोबा गावातील आडवामाळ येथील गट नं. १४० व गट नं. २७७ या सरकारी गायरान हद्दीतील जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाने २००५-२००६ मध्ये वृक्षलागवड केली होती. मात्र ही चांगल्या स्थितीतील आणि मोठी झालेली झाडे यंत्राच्या साहाय्याने काढून टाकण्यात आली. या जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले तसेच या जमिनीत बोअरवेलही घेण्यात आला. या सरकारी जमिनीवर संबंधिताने इंदिरा आवास योजनेतून २०१५- १६ साली घरकूल बांधले आहे. या गटाच्या जवळच गुणवडी तलाव असल्याने पाण्याची अवैध पाइपलाइन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. याच परिसरातील अनेक लोक या गायरानावर शेळ््या, मेंढ्या व गावरान जनावरे चारण्यास आणतात. मात्र या अतिक्रमणामुळे त्यांनाही अटकाव करण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाºयावर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या गटातील जमिनीची मोजणी करुन पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पुन्हा वृक्षलागवड करुन सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन करण्यात यावे. या मागणीची दखल न घेतल्यास शेळ््या-मेंढ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

अतिक्रमणप्रकरणी गावातील ६५ लोकांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. यानंतर तत्कालीन सर्कल वाघ व कामगार तलाठी यांनी पाहणी करुन तहसीलदारांनी अहवाल पाठविला आहे. त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

सर्वच झाडे जळाली कशी?या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून अधिकाºयांची दिशाभूल केली जात आहे. खोटी माहिती दिली जात आहे. या गटातील सर्वच झाडे दुष्काळामुळे कशी जळू शकतात. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी.- संजय पवार, तक्रारदार

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरforest departmentवनविभाग