शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

भारनियमनातही लादला इमर्जन्सीचा ‘भार’

By admin | Updated: May 28, 2014 00:06 IST

चंद्रकांत शेळके, अहमदनगर सहा ते साडेआठ तासांचे भारनियमन, इमर्जन्सी शटडाऊनच्या नावाखाली रात्री-अपरात्री खंडित होणारी वीज अन् त्यात भरीस भर म्हणून पार्‍याने ओलांडलेली चाळिशी,

चंद्रकांत शेळके, अहमदनगर सहा ते साडेआठ तासांचे भारनियमन, इमर्जन्सी शटडाऊनच्या नावाखाली रात्री-अपरात्री खंडित होणारी वीज अन् त्यात भरीस भर म्हणून पार्‍याने ओलांडलेली चाळिशी, अशा कात्रीत सापडल्याने सध्या नागरिक उष्म्याने हैराण झाले आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागातील जनजीवनच जणू विस्कळीत झाले आहे. सध्या ग्रामीण भागासह सर्वत्रच भारनियमनाची अंमलबजावणी होते. मागणी व वसुलीनुसार ठरलेले ग्रुपनिहाय भारनियमन नित्यनेमाने सुरू आहे. परंतु पारा ४० अंशावर गेल्याने उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे घरगुती पंखे, वातानुकूलित यंत्रणा, फ्रिज, कुलर रात्रंदिवस सुरूच असतात. उन्हाळ्याच्या चार महिन्यांत विजेची मागणी एकदमच वाढते. त्यामुळे निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी तातडीचे भारनियमन हा उपाय महावितरणने शोधून काढला आहे. ग्रामीण भागातील बर्‍याच ठिकाणी सिंगल फेजचे काम झाले असले तरी त्यांना भारनियमनातून सुटका मिळालेली नाही. सहा ते तब्बल आडेआठ तास हे नेहमीचे भारनियमन आणि वरून तातडीच्या नावाखाली कधीही, अनिश्चित काळापर्यंत खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. पिठाच्या चक्क्या बंद असल्याने महिलांची तारांबळ उडते. पाच-दहा किलोमीटरची रपेट करत शेजारील गावावरून दळणाची तजवीज करावी लागते. रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. पाणीयोजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. शेतकर्‍यांना तर वीज कधी येते न जाते हेच कळत नाही. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असली तरी काही ठिकाणी पाणी टिकून आहे. भाजीपाला, चारापिके, फळबागा तगवण्याची कसरत शेतकर्‍यांपुढे आहे.