शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:21 IST

आकाश येवले लोकमत न्यूज नेटवर्क राहुरी : शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कृषी उद्योजक बनविण्यावर भर राहील. शेतकऱ्यांना शिक्षणाची अट ...

आकाश येवले

लोकमत न्यूज नेटवर्क

राहुरी : शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कृषी उद्योजक बनविण्यावर भर राहील. शेतकऱ्यांना शिक्षणाची अट न ठेवता त्यांना प्रशिक्षण देऊन पिकांचे उत्पादन कसे वाढवता येईल, यावर भर दिला जाईल, असे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. पी. जी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डॉ. पाटील यांची नुकतीच कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी ‘लोकमत’ने गुरुवारी संवाद साधला.

शेतकऱ्यांना कोणकोणत्या विषयांचे प्रशिक्षण देणार?

डाॅ. पाटील - शिक्षण, संशोधन व प्रसारण यावर भर देताना शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यातील समन्वय साधण्यावर भर दिला जाईल. शिकलेले युवक आता अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती घेऊन अत्याधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यांना विद्यापीठाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. शेळीपालन, गायपालन, मच्छीपालन, मधमाशी पालन, कुक्कुटपालन असे शेतीला पूरक जोडधंदे अधिक प्रमाणात उभे करावे लागणार आहेत. शेतीतून उत्पादन वाढवून दोन पैसे मिळाले तर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्या दृष्टिकोनातून काम करावे लागणार आहे.

शेतकऱ्यांसाठी कोणती पीक पद्धती फायदेशीर ठरेल?

डॉ. पाटील - एकाच पद्धतीच्या पिकावर अवलंबून न राहता, बहुपीक पद्धतीवर भर देण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतल्यास आत्मविश्वास वाढेल. त्यातून उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील. वारंवार उसाचे पाचट जाळले जाते. त्यावर पाचटाचे महत्त्व पटवून द्यावे लागणार आहे. उसाला अडीच हजार रुपये टन तर पाचटाला सहा हजार रुपये टन इतका भाव आहे. त्याचा वापर शेतात अच्छादनासाठी केला जातो. पाचट जाळून न टाकता कुटी करावी किंवा पाचट गाडून जमिनीची ताकद वाढवावी. पाचट काढल्याने पिकात सुधारणा होऊन उत्पादन वाढते, हे पटवून देण्याचे काम भविष्यात विद्यापीठाला करावे लागणार आहे.

पीक उत्पादन वाढ आणि मालाच्या विक्री विषयी शेतकऱ्यांना काय सांगणार?

डॉ. पाटील - शेतकऱ्यांना पीक कसे पिकवायचे माहिती आहे. परंतु, विकायचे कसे हे माहिती नाही. त्यांना पिकवलेल्या मालाला विकायचे कसे, हेच सांगणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना फक्त पाणी वाचवा, हे सांगून चालणार नाही. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून उत्पादन कसे वाढते, ठिबकच्या तंत्रज्ञानाच्या वापर कसा करावा, हे काम पुढील काळात विद्यापीठाला करायचे आहे. मातीची सुपिकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचे प्रमाण वाढवावे लागेल.

हवामानात रोज बदल होतात. त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होते. यासाठी उपाययोजना काय?

डॉ. पाटील - आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले जाईल. त्याला अनुसरून बदल करावे लागणार आहेत. ज्या हवामानात एखादे पीक येते, ते अगोदर घेतले पाहिजे. जेणेकरून त्या पिकाला भाव जास्त कसा मिळेल, त्या दृष्टिकोनातून इथून पुढे प्रयत्न करावे लागणार आहेत.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता आहे काय?

डॉ. पाटील - कृषी विद्यापीठातील रिक्त जागांविषयी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मनुष्यबळ जरी कमी असले, तरी मार्ग काढून शिक्षण संशोधन आणि विस्तार याकडे लक्ष दिले जाईल. सर्वांच्या सहकार्याने तळागाळापर्यंत विद्यापीठाचे संशोधन कसे जाईल, त्या दृष्टिकोनातून कामे केली जातील.