शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:21 IST

आकाश येवले लोकमत न्यूज नेटवर्क राहुरी : शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कृषी उद्योजक बनविण्यावर भर राहील. शेतकऱ्यांना शिक्षणाची अट ...

आकाश येवले

लोकमत न्यूज नेटवर्क

राहुरी : शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कृषी उद्योजक बनविण्यावर भर राहील. शेतकऱ्यांना शिक्षणाची अट न ठेवता त्यांना प्रशिक्षण देऊन पिकांचे उत्पादन कसे वाढवता येईल, यावर भर दिला जाईल, असे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. पी. जी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डॉ. पाटील यांची नुकतीच कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी ‘लोकमत’ने गुरुवारी संवाद साधला.

शेतकऱ्यांना कोणकोणत्या विषयांचे प्रशिक्षण देणार?

डाॅ. पाटील - शिक्षण, संशोधन व प्रसारण यावर भर देताना शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यातील समन्वय साधण्यावर भर दिला जाईल. शिकलेले युवक आता अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती घेऊन अत्याधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. त्यांना विद्यापीठाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. शेळीपालन, गायपालन, मच्छीपालन, मधमाशी पालन, कुक्कुटपालन असे शेतीला पूरक जोडधंदे अधिक प्रमाणात उभे करावे लागणार आहेत. शेतीतून उत्पादन वाढवून दोन पैसे मिळाले तर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्या दृष्टिकोनातून काम करावे लागणार आहे.

शेतकऱ्यांसाठी कोणती पीक पद्धती फायदेशीर ठरेल?

डॉ. पाटील - एकाच पद्धतीच्या पिकावर अवलंबून न राहता, बहुपीक पद्धतीवर भर देण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतल्यास आत्मविश्वास वाढेल. त्यातून उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील. वारंवार उसाचे पाचट जाळले जाते. त्यावर पाचटाचे महत्त्व पटवून द्यावे लागणार आहे. उसाला अडीच हजार रुपये टन तर पाचटाला सहा हजार रुपये टन इतका भाव आहे. त्याचा वापर शेतात अच्छादनासाठी केला जातो. पाचट जाळून न टाकता कुटी करावी किंवा पाचट गाडून जमिनीची ताकद वाढवावी. पाचट काढल्याने पिकात सुधारणा होऊन उत्पादन वाढते, हे पटवून देण्याचे काम भविष्यात विद्यापीठाला करावे लागणार आहे.

पीक उत्पादन वाढ आणि मालाच्या विक्री विषयी शेतकऱ्यांना काय सांगणार?

डॉ. पाटील - शेतकऱ्यांना पीक कसे पिकवायचे माहिती आहे. परंतु, विकायचे कसे हे माहिती नाही. त्यांना पिकवलेल्या मालाला विकायचे कसे, हेच सांगणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना फक्त पाणी वाचवा, हे सांगून चालणार नाही. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून उत्पादन कसे वाढते, ठिबकच्या तंत्रज्ञानाच्या वापर कसा करावा, हे काम पुढील काळात विद्यापीठाला करायचे आहे. मातीची सुपिकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचे प्रमाण वाढवावे लागेल.

हवामानात रोज बदल होतात. त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होते. यासाठी उपाययोजना काय?

डॉ. पाटील - आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले जाईल. त्याला अनुसरून बदल करावे लागणार आहेत. ज्या हवामानात एखादे पीक येते, ते अगोदर घेतले पाहिजे. जेणेकरून त्या पिकाला भाव जास्त कसा मिळेल, त्या दृष्टिकोनातून इथून पुढे प्रयत्न करावे लागणार आहेत.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता आहे काय?

डॉ. पाटील - कृषी विद्यापीठातील रिक्त जागांविषयी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मनुष्यबळ जरी कमी असले, तरी मार्ग काढून शिक्षण संशोधन आणि विस्तार याकडे लक्ष दिले जाईल. सर्वांच्या सहकार्याने तळागाळापर्यंत विद्यापीठाचे संशोधन कसे जाईल, त्या दृष्टिकोनातून कामे केली जातील.