शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश : १३ जुलैपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:12 IST

दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे़ अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाकडून उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़

अहमदनगर : दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे़ अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाकडून उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़ १३ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असून, १३ जुलै अखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे़बुधवारी (दि़१२) नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजमधील राजर्षी शाहू महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता अकरावी प्रवेशाबाबत नियोजन बैठक घेण्यात आली़ प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे त्यांनी प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक घेतली़ बैठकीत प्रत्येक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमधील जागांचा आढावा घेऊन प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली़ अकरावी प्रवेशासाठी १३ ते २४ जून या काळात कॉलेज स्तरावर प्रवेश अर्जाचें वाटप करणे, २५ ते २८ जून दरम्यान भरलेले फॉर्म सादर करणे, २९ व ३० जून रोजी कॉलेज स्तरावर प्रवेश अर्जांची छाननी करणे, १ जुलै रोजी चेक लिस्ट प्रसिद्ध करुन आक्षेप दुरुस्ती करणे, २ जुलै रोजी प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे तसेच २ ते ६ जुलैपर्यंत प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे, ८ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करुन १० जुलैपर्यंत दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे, ११ जून रोजी जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करुन १३ जुलैपर्यंत प्रवेश देण्याचे नियोजन उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़ १३ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया बंद करुन १५ जुलैपासून कॉलेज नियमित सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही जागा रिक्त असल्यास प्राचार्यांच्या अधिकारात २५ जुलैपर्यंत प्रवेश देण्याची मुभा देण्यात आली आहे़ मात्र, त्यानंतर प्रवेश झाल्यास संबंधित कॉलेजवर कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले़ गुणवत्तेनुसार प्रवेश देताना राखीव जागांचे प्रमाण काटेकोरपणे पाळावे, असेही आदेशात म्हटले आहे़ मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ५२ टक्के जागा व विशेष आरक्षणाच्या १३ टक्के जागा अशा एकूण ६५ टक्के जागा आरक्षणातून भरण्यात येणार आहेत़अशी आहे आरक्षणाची टक्केवारीएससी १३ टक्के, एसटी ७ टक्के, ओबीसी १९ टक्के, एसबीसी २ टक्के, एनटी (अ) ३ टक्के, एनटी (ब) २़५ टक्के, एनटी (क) ३़५ टक्के, एनटी (ड) २ टक्के अशा ५२ टक्के जागा जातीनिहाय आरक्षणातून भरल्या जाणार आहेत़ तर विशेष आरक्षणातून आजी-माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक व नोकरीत बदल झालेल्या शासकीय नोकरदारांच्या पाल्यांसाठी ५ टक्के जागा राखीव असतील़ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के व ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा राखीव राहतील, असे शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी सांगितले़प्रवेश अर्ज विनामूल्यअनुदानित प्रवेश पूर्ण झाल्यानंतरच विनाअनुदानित जागांवरील प्रवेश सुरु करावेत़ विनाअनुदानित प्रवेश देताना जास्तीचे शुल्क आकारल्यास तसेच प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका देताना विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय