शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

अकरावी प्रवेश : १३ जुलैपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:12 IST

दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे़ अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाकडून उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़

अहमदनगर : दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे़ अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाकडून उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़ १३ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असून, १३ जुलै अखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे़बुधवारी (दि़१२) नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजमधील राजर्षी शाहू महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता अकरावी प्रवेशाबाबत नियोजन बैठक घेण्यात आली़ प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे त्यांनी प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक घेतली़ बैठकीत प्रत्येक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमधील जागांचा आढावा घेऊन प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली़ अकरावी प्रवेशासाठी १३ ते २४ जून या काळात कॉलेज स्तरावर प्रवेश अर्जाचें वाटप करणे, २५ ते २८ जून दरम्यान भरलेले फॉर्म सादर करणे, २९ व ३० जून रोजी कॉलेज स्तरावर प्रवेश अर्जांची छाननी करणे, १ जुलै रोजी चेक लिस्ट प्रसिद्ध करुन आक्षेप दुरुस्ती करणे, २ जुलै रोजी प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे तसेच २ ते ६ जुलैपर्यंत प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे, ८ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करुन १० जुलैपर्यंत दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे, ११ जून रोजी जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करुन १३ जुलैपर्यंत प्रवेश देण्याचे नियोजन उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़ १३ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया बंद करुन १५ जुलैपासून कॉलेज नियमित सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही जागा रिक्त असल्यास प्राचार्यांच्या अधिकारात २५ जुलैपर्यंत प्रवेश देण्याची मुभा देण्यात आली आहे़ मात्र, त्यानंतर प्रवेश झाल्यास संबंधित कॉलेजवर कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले़ गुणवत्तेनुसार प्रवेश देताना राखीव जागांचे प्रमाण काटेकोरपणे पाळावे, असेही आदेशात म्हटले आहे़ मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ५२ टक्के जागा व विशेष आरक्षणाच्या १३ टक्के जागा अशा एकूण ६५ टक्के जागा आरक्षणातून भरण्यात येणार आहेत़अशी आहे आरक्षणाची टक्केवारीएससी १३ टक्के, एसटी ७ टक्के, ओबीसी १९ टक्के, एसबीसी २ टक्के, एनटी (अ) ३ टक्के, एनटी (ब) २़५ टक्के, एनटी (क) ३़५ टक्के, एनटी (ड) २ टक्के अशा ५२ टक्के जागा जातीनिहाय आरक्षणातून भरल्या जाणार आहेत़ तर विशेष आरक्षणातून आजी-माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक व नोकरीत बदल झालेल्या शासकीय नोकरदारांच्या पाल्यांसाठी ५ टक्के जागा राखीव असतील़ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के व ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा राखीव राहतील, असे शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी सांगितले़प्रवेश अर्ज विनामूल्यअनुदानित प्रवेश पूर्ण झाल्यानंतरच विनाअनुदानित जागांवरील प्रवेश सुरु करावेत़ विनाअनुदानित प्रवेश देताना जास्तीचे शुल्क आकारल्यास तसेच प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका देताना विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय