शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पहिल्या टप्प्यात १५६ सहकारी संस्थांच्या निवडणूका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सहकारी संस्थांच्या सहा टप्प्यात निवडणूका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : सहकारी संस्थांच्या सहा टप्प्यात निवडणूका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५६ सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसल्यानंतर जिल्हयात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका यापूर्वी तीनवेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या १ हजार ६८६ इतकी आहे. यापैकी न्यायालयाच्या आदेशाने १७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. उर्वरित ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, त्या सहकारी संस्थांची पहिल्या टप्प्यात निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सहकारी प्राधिकरणाने दिला आहे. त्यानुसार येथील उपजिल्हा निबंधक कार्यालयाकडून मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या १५६ सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर थांबल्या होत्या, त्या टप्प्यापासून सुरू निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक असलेल्या बहुतांश सहकारी संस्थांच्या मदारयाद्या अंतिम करण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील मागीलवर्षी मुदत संपलेल्या सहकारी संस्था १ हजार ८६ इतक्यात आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे मागीलवर्षी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका चालू वर्षात होत आहेत. त्यात चालू वर्षात मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या १ हजार २९१ इतकी आहे. त्यामुळे दोन्ही वर्षांत मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका एकाच वर्षात होणार आहेत. जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपाठोपाठ सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे.

...

जिल्हा बँकेसाठी दिग्विजय आहेर निवडणूक अधिकारी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठीची अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर साधारण १५ दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. जिल्हा बँकेची मतदारयादी जाहाीर होऊन आठ दिवस उलटून गेले असून, पुढील आठवड्यात बँकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरीस संचालक मंडळांच्या निवडणूकीसाठी मतदान होण्यची शक्यता आहे. बँकेच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत असून, या निवडणूकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तूळाचे लक्ष लागून आहे.