शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत पैशांचा ‘अधिकृत’ महापूर

By admin | Updated: November 28, 2014 01:15 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात अक्षरश: पैशांचा महापूर वाहिला़ जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील १३५ उमेदवारांनी

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात अक्षरश: पैशांचा महापूर वाहिला़ जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील १३५ उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारावर तब्बल ७ कोटी ६३ लाख ९२ हजार रुपये खर्च केल्याचे जिल्हा निवडणूक शाखेच्या अहवालावरून उघड झाले आहे़ नेवासा मतदारसंघात सर्वाधिक ८३ लाख रुपयांचा चुराडा झाला असून,पाथर्डीत सर्वात कमी ३६ लाख ८८ हजार रुपये प्रचारावर खर्च झाले आहेत़जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी तब्बल १३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ आघाडी व युतीने ‘एकला चलो रे’ची हाक दिल्याने पहिल्यांदाच उमेदवारांची एवढी संख्या वाढली़ चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्याने दिग्गजांचा कस लागला़ जिल्ह्यातील साखर सम्राटांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती़ त्यामुळे निवडणुकीत पैशांचा महापूर येणार असल्याची अपेक्षा सर्वांनाच होती आणि घडलेही तसेच़ प्रस्थापितांनी राजकारणात बसविलेले गेल्या अनेक दिवसांचे बस्तान कायम ठेवण्यासाठी निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला़ खर्चासाठी हात मोकळा सोडूनही काहींच्या पदरी निराशाच आली़ तर काहींनी कमी खर्चात निवडणुकीत बाजी मारली़ जिल्ह्यातील काही मतदारसंघात मनी फॅक्टर चालला नाही़ निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब पाहिल्यास हे प्रकर्षाने जाणवते़ जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारावर मोठा खर्च झाला़ परंतु उमेदवारांनी प्रशासनाच्या चौकटीत बसेल, एवढाच खर्च केला असून, एकानेही खर्चाची २८ लाखांची लक्ष्मण रेषा ओलांडली नाही़ त्यामुळे विजयी व पराभूत उमेदवारांची निवडणुकीनंतरच्या कारवाईतून सुटका झाली आहे़ (प्रतिनिधी)