शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

साडेचारशे जणांना निवडणूक बंदी : वेळेत खर्च सादर न केल्याने फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:23 IST

गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला.

अहमदनगर : गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला. त्यामुळे ४५१ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक बंदी असणार आहे.गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया २०७ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका ५ आॅक्टोबर २०१७ रोजी झाल्या. ९ आॅक्टोबरला निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. निवडणूक लढविणाºया सर्वच उमेदवारांना निकालानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबर २०१७पर्यंत निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे अपेक्षित आहे. मात्र निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४८४ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना नोटिसा पाठवून म्हणणे मागवण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासमोर जुलै २०१८मध्ये यावर दोन दिवस सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत ३३ जणांनी निवडणूक खर्चाचा समाधानकारक खुलासा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. मात्र उर्वरित ४५१ उमेदवारांनी समाधानकारक खुलासा न केल्याने अखेर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी त्यांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अनेक दिग्गजांची अडचण झाली आहे.दरम्यान, या उमेदवारांना जिल्हाधिका-यांच्या या अपात्र आदेशाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची संधी असल्याने तेथे त्यांना दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर