शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

संगमनेरातील संदिपनी ॠ षी बालिका आश्रम-मुलींचा सांभाळ करणारे वयोवृद्ध आदर्श माता-पिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 19:56 IST

रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यामध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!

शेखर पानसरे । 

संगमनेर : सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सोमनाथ तात्याबा कळसकर व पत्नी नलिनी कळसकर हे वयोवृद्ध दाम्पत्य अनेक वर्षांपासून गरजू, गरीब, निराधार मुलींचा सांभाळ करत आहेत. दाम्पत्याने १४ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संदिपनी ॠ षी बालिका आश्रमात सध्या २७ मुली वास्तव्यास आहेत. सेवानिवृत्तीनंतर मिळणाºया पेन्शनमधून पालकत्वाची जबाबदारी सक्षमपणे स्वीकारली आहे.   ‘देशाने माझ्यासाठी काय केलं, या पेक्षा मी देशासाठी काय केलं’, हे महत्वाचं आहे. या विचाराने वागणारे कळसकर गुरूजी व त्यांची पत्नी नलिनी. या दोघांचाही पेशा शिक्षकाचा. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. १९७५ साली गुरूजींची बदली घुलेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली. कंजारभाट समाजातील मुलांना शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी १९७६ साली शाळेच्या जवळच गोकूळ नावाचे वसतिगृह स्व खर्चातून सुरू केले. मुलांचा अभ्यास, जेवण, राहणे अशी सर्व व्यवस्था येथेच करण्यात आली. कंजारभाट समाजातील मुलांचे जीवन समृद्ध करण्यात कळसकर गुरूजींचा मोलाचा वाटा आहे. ही अनेक मुले आज उच्चपदस्थ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत आहेत. साखर शाळा, वस्तीशाळा, बालवाडी या सारख्या शैक्षणिक  प्रकल्पांसाठी नेहमीच पुढाकार घेणाºया कळसकर गुरूजींना दिल्ली येथे ५ सप्टेंबर १९८८ ला उपराष्टÑपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्टÑीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     गोरगरिबांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी १९८९ साली इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत संगमनेरातील इंदिरानगरमध्ये त्यांनी कळसकर विद्यालय सुरू केले. २ जून २००० ला कळसकर गुरूजी सेवानिवृत्त झाले. परिस्थितीमुळे कोणीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी कळसकर दाम्पत्याने त्यांच्या घरीच मुलींची चहा, नाष्टा, जेवण, राहणे अशी सर्व सोय केली. जागा कमी पडू लागल्याने शाळेच्या परिसरात खोल्या बांधत २१ जून २००६ ला संदिपनी ॠ षी बालिका आश्रम सुरू केले. या आश्रमात संगमनेर, अकोले, पारनेर या तालुक्यातील २७ मुली वास्तव्यास आहेत. सर्व खर्च कळसकर दाम्पत्य हे त्यांना मिळणाºया पेन्शनमधून करते. अनेक मुली नोकरीला लागून स्वत:च्या पायावर गुरूजींनी दिलेल्या आधारामुळे भक्कमपणे उभ्या आहेत.

‘प्रयत्न हाच परमेश्वर आहे’ ‘मानवसेवा हिच ईश्वरसेवा आहे’ आणि त्याच वाटेने आम्ही चाललो आहोत. गरजूंना आधार देण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही. उदार मनाची आवश्यकता आहे. इच्छा असली, की मार्ग सापडतो. माणसाचा प्रामाणिक, चांगला हेतू असला की, यश त्याच्यामागे जाते. माणसाला यशामागे धावण्याची गरज नाही.      - सोमनाथ कळसकर /     नलिनी कळसकर