शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीपुत्राच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रशासन घेईना दखल

By चंद्रकांत शेळके | Updated: October 18, 2023 21:01 IST

आठ दिवसांपासून उपोषण सुरू

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा किमान १० तास मोफत अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा, नोकऱ्यांचे खासगीकरण व सरकारी शाळांचे व्यापारीकरण हे निर्णय मागे घेण्यात यावेत, नोकरभरतीसाठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे १ हजार रुपये परीक्षा शुल्क रद्द करण्यात यावे आदी मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकरीपूत्र बाळासाहेब कोळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आठ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून अद्याप प्रशासन किंवा शासनाने त्यांची दखल घेतलेली नाही.

कोळसे पाटील (आडगाव, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात म्हटले आहे की, आपण शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र व दिल्लीपर्यंत सायकल प्रवास केला आहे. परंतु मागण्यांची कोणीही दखल घेतली नसल्याने १२ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आठवा दिवस असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्न निरुपयोगी ठरताना दिसत आहेत.

कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना मोफत पाणी व मोफत वीज पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे किमान १० तास दिवसा मोफत अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा.

नोकऱ्यांचे खासकीकरण व कंत्राटीकरण, तसेच सरकारी शाळांचे व्यापारीकरण हा अन्याकारक निर्णय असल्याने सरकारने तो मागे घेतला पाहिजे. राज्यात तबल १० वर्षांनंतर तलाठी, जिल्हा परिषद, वन विभाग, जलसंपदा, आरोग्य विभाग अशा विविध विभागात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु यासाठी घेतले जाणारे १ हजार रुपये परीक्षा शुल्क अवाजवी असून ते रद्द करावे, या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर