शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शेतकरीपुत्राच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रशासन घेईना दखल

By चंद्रकांत शेळके | Updated: October 18, 2023 21:01 IST

आठ दिवसांपासून उपोषण सुरू

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा किमान १० तास मोफत अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा, नोकऱ्यांचे खासगीकरण व सरकारी शाळांचे व्यापारीकरण हे निर्णय मागे घेण्यात यावेत, नोकरभरतीसाठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे १ हजार रुपये परीक्षा शुल्क रद्द करण्यात यावे आदी मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकरीपूत्र बाळासाहेब कोळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आठ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून अद्याप प्रशासन किंवा शासनाने त्यांची दखल घेतलेली नाही.

कोळसे पाटील (आडगाव, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात म्हटले आहे की, आपण शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र व दिल्लीपर्यंत सायकल प्रवास केला आहे. परंतु मागण्यांची कोणीही दखल घेतली नसल्याने १२ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आठवा दिवस असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्न निरुपयोगी ठरताना दिसत आहेत.

कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना मोफत पाणी व मोफत वीज पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे किमान १० तास दिवसा मोफत अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा.

नोकऱ्यांचे खासकीकरण व कंत्राटीकरण, तसेच सरकारी शाळांचे व्यापारीकरण हा अन्याकारक निर्णय असल्याने सरकारने तो मागे घेतला पाहिजे. राज्यात तबल १० वर्षांनंतर तलाठी, जिल्हा परिषद, वन विभाग, जलसंपदा, आरोग्य विभाग अशा विविध विभागात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु यासाठी घेतले जाणारे १ हजार रुपये परीक्षा शुल्क अवाजवी असून ते रद्द करावे, या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर