शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अठरा महिन्यांनंतर वाजली सुप्यातील शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:22 IST

सुपा : तब्बल अठरा महिन्यांनंतर पारनेर तालुक्यातील सुपा येथील माध्यमिक विद्यालयाची घंटा वाजली व आठवी ते बारावीच्या मुलांची शाळा ...

सुपा : तब्बल अठरा महिन्यांनंतर पारनेर तालुक्यातील सुपा येथील माध्यमिक विद्यालयाची घंटा वाजली व आठवी ते बारावीच्या मुलांची शाळा भरली. पाठीवर सॅक घेऊन आलेल्या गणवेशधारी मुले, मुली यांच्या उपस्थितीने शाळेला जणू आनंदाचे भरते आले. भयानक शांततेच्या ठिकाणी तब्बल दीड वर्षानंतर वर्गातून अध्ययन अध्यापन सुरू झाले.

सुपा येथील माध्यमिक विद्यालय सुरू झाले असले तरी सुपा परिसरातील छत्रपती शिवाजी विद्यालय (रांजणगाव), वाळवणे येथील श्री भैरवनाथ विद्यालय बंद असून, या विद्यार्थ्यांना व पालकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. ही विद्यालये ४ ऑक्टोबरपासून सुरू होतील, असे सांगितले जाते. वाडेगव्हाण येथील प्रभू विद्याधाम नियमितपणे सुरू असल्याचे या सरपंच बाळासाहेब सोनवणे यांनी सांगितले. रुई छत्रपती येथील दहावीचा वर्ग सुरू करण्यात आला असून, उर्वरित वर्ग अद्यापि सुरू नसल्याने या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू असल्याचे सांगण्यात आले. वाघुंडे खुर्द येथील बाळानंद स्वामी विद्यालय सुरू असून, त्यांचे नियमित कामकाज सुरू असल्याचे शाळा समितीचे व संस्थेचे अध्यक्ष संदीप मगर यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद असून, त्यात शिकणारे काही विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेपासून दुरावले आहेत. आता आपले शिक्षण थांबले असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. वर्ग बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, असलाच तर त्यासाठी नेट पॅक नाही, तेही उपलब्ध झाले तर रेंज नाही आणि रेंज मिळालीच तर बॅलन्स संपलेला असे अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाले आहेत. कधी पालकांकडे मोबाईल असल्यानेही मुलांना ऑनलाईन वर्गासाठी जॉईन होता येत नाही. यात चिमुकल्यांची दमछाक होऊन त्यांच्या जिवाचा कोंडमारा होतो. त्यामुळे कधी एकदा शाळा सुरू होऊन ही आपत्ती संपतेय, याची मुले वाट पाहात आहेत. कोरोनाच्या महामारीने शिक्षण क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले असून, कारखानदारी, उत्पादन क्षेत्र व अन्य क्षेत्रापेक्षा कधीही भरून न येणारे नुकसान शिक्षणाबाबत झाल्याचे जाणकार मंडळींनी सांगतात.

............

पालकांच्या संमतीने स्पर्धा परीक्षेचे वर्ग

अंगणवाडी, बालवाडी, अप्पर केजी, लोअर केजी, पहिली व दुसरी अशा या चिमुकल्याच्या शाळा बंद राहिल्याने व त्यांना ऑनलाईनचा गंधच नसल्याने मोठी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याचे अवघड काम गुरुजनांना करावे लागणार आहे. सुप्यातील स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचेही तास सुरू झाले असले तरी पालकांची संमती घेऊनच व सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून वर्ग सुरू करण्यात आले असल्याचे शालेय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.