शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

टंचाई कृती आराखड्यासाठी आठ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST

अहमदनगर : यंदा जिल्ह्यात मुबलक पाऊस होऊनही जिल्हा परिषदेने आठ कोटी अकरा लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला ...

अहमदनगर : यंदा जिल्ह्यात मुबलक पाऊस होऊनही जिल्हा परिषदेने आठ कोटी अकरा लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला असून तो मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.

उन्हाळ्यातील टंचाईची स्थिती लक्षात घेता दरवर्षी जिल्हा परिषदेकडून ऑक्टोबर ते जून या कालावधीसाठी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यामध्ये टँकर तसेच विविध पाणी उपलब्धतेच्या योजना तयार केल्या जातात व हा आराखडा नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो.

जिल्ह्यात यंदा २६१ गावे, तसेेेेच ८५३ वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईची शक्यता जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त्त केेली जात आहे. या टंचाई कृती आराखड्यात ३७९ उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्यासाठी ८ कोटी ११ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

यंदाच्या आराखड्यात बुडक्या खोदण्यास तरतूद करण्यात आली नसून विहीर खोलीकरणाचा अवघा एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. खासगी विहीर अधिग्रहणाचे ८३ प्रस्ताव घेण्यात आले आहेत. चालूवर्षी मुबकल पावसानंतरही जिल्ह्यातील १३८ गावे आणि ६८६ गावांत सरकारी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे आणि त्यासाठी ६ कोटी ३५ लाखांची तरतूद केलेली आहे. साधारण मार्चनंतर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गतवर्षी पाणीपुरवठा विभागाने कमी पावसामुळे ५० कोटींचा टंचाई कृती आरखडा तयार केला होता.

.................

टंचाई कृती आराखड्यातील तरतुदी

विहीर खोलीकरण -१ गाव, ५ वाड्या आणि १ उपाययोजना २५ हजारांची तरतूद.

खासगी विहीर अधिग्रहण - ८३ गावे, १०२ वाड्या आणि १७२ उपाययोजनेसह ८६ लाख ४० हजारांची तरतूद.

बैलगाडीवरील टँकरद्वारे पाणीपुरवठा- १७ गावे, २ वाड्या आणि ३९ उपाययोजनेसह १७ लाखांची तरतूद.

टँकरद्वारे पाणीपुरवठा- १३८ गावे, ६८६ वाड्या आणि १३८ उपाययोजना ६ कोटी ३५ लाखांची तरतूद.

नळपाणी योजना विशेष दुरुस्ती - ५ गावे, २८ वाड्या आणि ६ उपाययोजना १६ लाखांची तरतूद.

नवीन बोअरवेल घेणे -६ वाड्या, ६ उपायोजना आणि ३ लाख ३० हजारांची तरतूद.

तात्पुरती पूरक पाणी योजना - ७ गावे, २४ वाड्या आणि १० उपायोजनेसह ५३ लाख रुपयांची तरतूद.