शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पादन खर्च कमी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत - राहुरी विद्यापीठात ए. के. सिंग यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:28 IST

शेतक-यांचा प्रति एकर उत्पादन खर्च जास्त आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संशोधन व्हावे, असे आवाहन नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि पीक शास्त्र) डॉ. ए. के. सिंग यांनी बुधवारी येथे केले.

राहुरी : गेल्यावर्षी देशाने २७६ दशलक्ष टन धान्याचे उत्पादन घेतले असून फळे व भाजीपाल्याचे ३०० दशलक्ष टन उत्पादन घेतले आहे. शेतक-यांचा प्रति एकर उत्पादन खर्च जास्त आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संशोधन व्हावे, असे आवाहन नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि पीक शास्त्र) डॉ. ए. के. सिंग यांनी बुधवारी येथे केले.राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार-२०१७’ या बाराव्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य अांतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. चंद्रशेखर भुसारी, संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, आविष्कारचे समन्वयक निरीक्षक डॉ. प्रमोद पाबरेकर, पुणे येथील फलोत्पादन संचालक व विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य डॉ. के.व्ही. प्रसाद, वित्त समिती समन्वयक डॉ. विवेक साठे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जगन्नाथ पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र पाटील, कुलसचिव डॉ. दिलीप पवार उपस्थित होते.डॉ. सिंग यावेळी म्हणाले, आविष्कार-२०१७ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या विषयात अभ्यासून संशोधन वृत्तीत सातत्य ठेवल्यास उद्या हेच तरुण तज्ज्ञ सल्लागार म्हणून ओळखले जातील़ आपले संशोधन समाजोपयोगी व वापरण्यास सोपे होण्याकडे लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे.कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, हे युग स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेत हार जीत महत्त्वाची नसून सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांची बुध्दी फार प्रगल्भ असते. त्याला चालना देणे गरजेचे आहे. ‘आविष्कार’ सारख्या संशोधन स्पर्धेमुळे हे साध्य होते. स्पर्धेत सहभागी झाले तर नेतृत्व गुणास चालना मिळते. आपले संशोधन शेतक-यांना कसे फायदेशीर ठरेल?, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शरद गडाख यांनी प्रास्ताविक केले. प्रेमराज चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. दिलीप पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी