शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

कृषी उत्पादन खर्च कमी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत - राहुरी विद्यापीठात ए. के. सिंग यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:28 IST

शेतक-यांचा प्रति एकर उत्पादन खर्च जास्त आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संशोधन व्हावे, असे आवाहन नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि पीक शास्त्र) डॉ. ए. के. सिंग यांनी बुधवारी येथे केले.

राहुरी : गेल्यावर्षी देशाने २७६ दशलक्ष टन धान्याचे उत्पादन घेतले असून फळे व भाजीपाल्याचे ३०० दशलक्ष टन उत्पादन घेतले आहे. शेतक-यांचा प्रति एकर उत्पादन खर्च जास्त आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संशोधन व्हावे, असे आवाहन नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि पीक शास्त्र) डॉ. ए. के. सिंग यांनी बुधवारी येथे केले.राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार-२०१७’ या बाराव्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य अांतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. चंद्रशेखर भुसारी, संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, आविष्कारचे समन्वयक निरीक्षक डॉ. प्रमोद पाबरेकर, पुणे येथील फलोत्पादन संचालक व विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य डॉ. के.व्ही. प्रसाद, वित्त समिती समन्वयक डॉ. विवेक साठे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जगन्नाथ पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र पाटील, कुलसचिव डॉ. दिलीप पवार उपस्थित होते.डॉ. सिंग यावेळी म्हणाले, आविष्कार-२०१७ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या विषयात अभ्यासून संशोधन वृत्तीत सातत्य ठेवल्यास उद्या हेच तरुण तज्ज्ञ सल्लागार म्हणून ओळखले जातील़ आपले संशोधन समाजोपयोगी व वापरण्यास सोपे होण्याकडे लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे.कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, हे युग स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेत हार जीत महत्त्वाची नसून सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांची बुध्दी फार प्रगल्भ असते. त्याला चालना देणे गरजेचे आहे. ‘आविष्कार’ सारख्या संशोधन स्पर्धेमुळे हे साध्य होते. स्पर्धेत सहभागी झाले तर नेतृत्व गुणास चालना मिळते. आपले संशोधन शेतक-यांना कसे फायदेशीर ठरेल?, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शरद गडाख यांनी प्रास्ताविक केले. प्रेमराज चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. दिलीप पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी