शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

कृषी उत्पादन खर्च कमी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत - राहुरी विद्यापीठात ए. के. सिंग यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:28 IST

शेतक-यांचा प्रति एकर उत्पादन खर्च जास्त आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संशोधन व्हावे, असे आवाहन नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि पीक शास्त्र) डॉ. ए. के. सिंग यांनी बुधवारी येथे केले.

राहुरी : गेल्यावर्षी देशाने २७६ दशलक्ष टन धान्याचे उत्पादन घेतले असून फळे व भाजीपाल्याचे ३०० दशलक्ष टन उत्पादन घेतले आहे. शेतक-यांचा प्रति एकर उत्पादन खर्च जास्त आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी संशोधन व्हावे, असे आवाहन नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि पीक शास्त्र) डॉ. ए. के. सिंग यांनी बुधवारी येथे केले.राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार-२०१७’ या बाराव्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य अांतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. चंद्रशेखर भुसारी, संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, आविष्कारचे समन्वयक निरीक्षक डॉ. प्रमोद पाबरेकर, पुणे येथील फलोत्पादन संचालक व विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य डॉ. के.व्ही. प्रसाद, वित्त समिती समन्वयक डॉ. विवेक साठे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जगन्नाथ पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र पाटील, कुलसचिव डॉ. दिलीप पवार उपस्थित होते.डॉ. सिंग यावेळी म्हणाले, आविष्कार-२०१७ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या विषयात अभ्यासून संशोधन वृत्तीत सातत्य ठेवल्यास उद्या हेच तरुण तज्ज्ञ सल्लागार म्हणून ओळखले जातील़ आपले संशोधन समाजोपयोगी व वापरण्यास सोपे होण्याकडे लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे.कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, हे युग स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेत हार जीत महत्त्वाची नसून सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांची बुध्दी फार प्रगल्भ असते. त्याला चालना देणे गरजेचे आहे. ‘आविष्कार’ सारख्या संशोधन स्पर्धेमुळे हे साध्य होते. स्पर्धेत सहभागी झाले तर नेतृत्व गुणास चालना मिळते. आपले संशोधन शेतक-यांना कसे फायदेशीर ठरेल?, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शरद गडाख यांनी प्रास्ताविक केले. प्रेमराज चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. दिलीप पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी