शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

गीता आणि कुराण संवादाचे प्रभावी माध्यम : हनिफ खान शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 19:47 IST

पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितले.

ठळक मुद्देसंगमनेरात सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत गीतेवर व्याख्यान

संगमनेर : पाच हजार १५८ वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून गीता प्रकटली. त्यानंतर सुमारे साडेतीन हजार वर्षांनी कुराण जन्माला आले. आश्चर्याची बाब म्हणजे गीतेत सांगितलेले तत्वज्ञान फक्त वेगळ्या लिपीत आणि भाषेत कुराणात सांगितले आहे. हे दोन्ही महान धार्मिक ग्रंथ म्हणजे वादाचे नव्हे तर संवादाचे प्रभावी माध्यम आहेत, असे प्रतिपादन संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक डॉ. मोहम्मद हनीफ खान शास्त्री यांनी केले.गीता परिवाराच्या वतीने भंडारी मंगल कार्यालयात गीतेतील वैश्विक विचार या विषयावर बुधवारी डॉ. खान यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे विचार सप्रमाण मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवान जोशी तर व्यासपीठावर गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेर शाखाप्रमुख सतीश इटप उपस्थित होते.डॉ. खान म्हणाले, गीता आणि कुराण यांची केवळ लिपी भिन्न आहे. बारकाईने अभ्यास केला तर दोन्हींचा गाभा एकच आहे. दोन्ही ग्रंथ सद्भावना, बंधुत्व आणि मानवतेचा पुरस्कार करणारे आहेत. द्वेषभावनेचा जराही लवलेश या महान ग्रंथांमध्ये नाही. डॉ. खान यांनी वेद, गीता, कुराण, अरण्यके, उपनिषदे यातील दाखले देत या सर्वांची शिकवण मानवतेच्या मुल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यात तिरस्काराला तसूभरही वाव नाही असे सांगीतले. राजकीय लाभासाठी आणि दोन समुदाय परस्परांशी झुंजविण्यासाठी आजवर त्यांचा दुरुपयोग होत आला. ही दुदैर्वाची गोष्ट असुन गीता ही अखिल विश्वातील मानवजातीला भारताने दिलेली सर्वोत्तम भेट आहे असल्याचे डॉ. खान म्हणाले.मुस्लीम समाजाच्या वतीने जुबेर इनामदार, डॉ. जी. पी. शेख, साजिद पठाण यांनी डॉ. खान यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश डागा व अभिजित गाडेकर यांनी केले. सतीश इटप यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता भांदुर्गे यांनी विशेष परिश्रम घेतले. संगमनेरातील सर्वधर्मीय नागरिकांनी हे व्याखान ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर