शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बांबू लागवडीतून पृथ्वी रक्षण चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST

अहमदनगर : कागदावर झाडे लावून खूप झाली. आता माणसाच्या डोक्यात झाड लावण्याची गरज आहे. सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या बांबू लागवडीमधूनच ...

अहमदनगर : कागदावर झाडे लावून खूप झाली. आता माणसाच्या डोक्यात झाड लावण्याची गरज आहे. सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या बांबू लागवडीमधूनच पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. झाड तोडले तर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची वेळ भविष्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी जास्तीत जास्त बांबूची लागवड करून पर्यावरण रक्षणासोबत आर्थिक उन्नतीही करून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी केले.

पाशा पटेल यांनी पर्यावरण रक्षणासाठी पृथ्वी रक्षण चळवळ सुरू केली आहे. त्याची माहिती पटेल यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. यावेळी मात्री मंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, नगर भाजपचे शहराध्यक्ष भैया गंधे, किरण पाटील उपस्थित होते.

यावेळी पटेल म्हणाले, संपूर्ण जगातच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. देशात आगामी काळात पेट्रोल-डिझेल बंद होणार आहे. लोक झाडे लावायला तयार नाहीत. त्यामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत असल्याने ऑक्स्जिन पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या आणि सर्वाधिक कार्बन शोषणाऱ्या बांबूची लागवड करणे काळाची गरज बनली आहे. याबाबत जागृती व कृती करण्यासाठी ‘पृथ्वी रक्षण चळवळ’ सुरू केली असून, त्यामध्ये कृतिशील सहभाग घेण्याचे आवाहन पटेल यांनी केले.

ते म्हणाले, आतापर्यंत दोनशे गावांत बैठका घेतल्या आहेत. बांबूच्या सोळा जाती असून, केंद्राने सात जाती लावण्यास परवानगी दिली आहे. एक एकर जमिनीवर २२० बांबूची झाडे लावता येतात. त्यापासून एक लाख रुपये उत्पन्न मिळते. त्याला दुप्पटही भाव मिळतो. आज सात लाख कोटी रुपये इंधनासाठी खर्च येतो. आता बांबूपासून इथेनॉलनिर्मिती करण्याचे तंत्रज्ञान भारतात शोधले आहे. याशिवाय बांबूपासून सीएनजी, कपडे, फर्निचर, तांदूळ, बिस्कीट, लोणचे तयार करता येणार आहे. बांधकामामध्ये सळईऐवजी १५ टक्के बांबू वापरण्यास सरकारने परवानगी दिली आहे. आता यापुढे बांबूला पीक म्हणून शेतात आणायचे आहे. बांबूच्या रोपांसाठी केंद्र व राज्य शासन अनुदान देत असल्याचेही पटेल म्हणाले.

--

फोटो -३० पाशा पटेल

बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तू दाखविताना पाशा पटेल. समवेत प्रा. भानुदास बेरड, किरण पाटील.