शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्मचाऱ्यांच्या लाँगमार्चमुळे महापालिकेत शुकशुकाट, अहमदनगरमधील कामकाज ठप्प

By अरुण वाघमोडे | Updated: October 3, 2023 19:04 IST

७५ टक्के कर्मचाऱ्यांचा आंदोलनात होता सहभाग

अरुण वाघमोडे/ अहमदनगर: सातवा वेतन आयोग लागू करावा, सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी संघटनेने सोमवारपासून नगर ते मंत्रालय (मुंबई) असा पायी लाँगमार्च काढला असून ७५ टक्के कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. मंगळवारी मनपाच्या मुख्य कार्यालयासह जुने कार्यालय व प्रभाग कार्यालयात अपवाद वगळता शुकशुकाट होता.

शहरातील दैनंदिन स्वच्छतेचे कामकाज थांबू नये, यासाठी मनपा प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार संस्थेच्या माध्यमातून तात्पुरते १५० कर्मचारी उपलब्ध करत शहरात सफाईचे काम सुरू केले. या कर्मचाऱ्यांना मात्र, शहरात विविध ठिकाणी काही जणांनी धक्काबुक्की करत दमदाटी करून काम करू नका, असे सांगितले.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत दमदाटी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असल्याचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले. दरम्यान सावेडी येथील कचरा रॅम्पवर मंगळवारी दुपारी १०० ते १५० जणांच्या जमावाने येत शहरात कचरा संकलन करू नका, घंटागाड्या ताेडू, असा ईशारा दिला. मनपाने नागरी सुविधांसाठी केलेल्या पर्यायी व्यवस्थेला विरोध होत असल्याने मनपा प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दमदाटी करणारे कोण आहेत. हे मात्र, स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर